शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

लग्नाच्यावेळी वधूने टॉयलेटच्या बहाण्याने काढला पळ; वर म्हणाला, "सर्व काही लुटले..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 10:55 IST

वराचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी त्याने वधूला साड्या आणि दागिने दिले होते. तसेच, लग्नाचा इतर खर्चही केला.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये (Gorakhpur) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्यावेळी वधूने रोख रक्कम आणि दागिने घेऊन पळ काढला. वधूसोबत तिची आईही घटनास्थळावरून बेपत्ता झाली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, एका व्यक्तीच्या मध्यस्थीने लग्न ठरवले होते, असे वराने सांगितले. तसेच, यासाठी मध्यस्थी व्यक्तीला ३० हजार रुपये देण्यात आल्याचेही वराने सांगितले.

रिपोर्टनुसार, हे प्रकरण गोरखपूरच्या खजनी परिसरातील आहे. याठिकाणी ४० वर्षीय शेतकरी आपल्या दुसऱ्या लग्नासाठी विधी पूर्ण करत होता. त्यांच्या पहिल्या पत्नीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. हा वर सीतापूरच्या गोविंदपूर गावचा रहिवासी आहे. लग्नासाठी ३० हजार रुपये देऊन त्याने मध्यस्थाच्या मदतीने लग्न ठरवले होते. 

वराचे म्हणणे आहे की, लग्नापूर्वी त्याने वधूला साड्या आणि दागिने दिले होते. तसेच, लग्नाचा इतर खर्चही केला. यानंतर तो आपल्या कुटुंबीयांसह लग्नासाठी मंदिरात पोहोचला, जिथे नववधू तिच्या आईसोबत हजर राहिली होती. लग्नाचे विधी सुरू होताच वधूने शौचालयाला जाण्याचा बहाणा केला आणि निघून गेली. त्यानंतर ती परत आलीच नाही. यादरम्यान तिची आईही बेपत्ता झाली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वराने सांगितले की, माझे कुटुंब पुन्हा उभे करण्यासाठी मी लग्न करण्याचे ठरवले होते, मात्र सर्व काही लुटले गेले. या प्रकरणाबाबत गोरखपूरचे एसपी (दक्षिण) जितेंद्र कुमार म्हणाले की, याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यास संपूर्ण घटनेची चौकशी केली जाईल.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश