शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

अरेरे! शेजारच्या तरुणीवर 3 मुलांच्या पित्याचा जीव जडला; पोलिसांनी पकडताच भलताच ट्विस्ट आला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 15:30 IST

3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला

नवी दिल्ली - बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एक विवाहित व्यक्ती शेजारी राहणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडला. दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि काही दिवसांनी ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांचे प्रेम इतके वाढले की एके दिवशी दोघेही घर सोडून पळून गेले. आंतरधर्मीय प्रकरणामुळे पोलीसही सतर्क झाले. यानंतर दोघांना महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, 3 मुलांच्या वडिलांचा शेजारी राहणाऱ्या एका तरुणीवर जीव जडला. जेव्हा प्रेम फुलले तेव्हा विवाहित पुरुष पत्नी आणि मुलांना सोडून प्रेयसीसह पळून गेला. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्रातून प्रियकर-प्रेयसीला अटक केली. हे संपूर्ण प्रकरण जादोपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. स्त्री-पुरुष वेगवेगळ्या धर्माचे असल्याने पोलीसही सतर्क झाले आणि पूर्ण तयारीनिशी कारवाईला लागले. मनन अन्सारी असं विवाहित प्रियकराचे नाव आहे. मनन हा जादोपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारा आहे. मनन अन्सारी यांनी सांगितले की, तो तीन मुलांचा बाप आहे. त्याचे पत्नीशी अनेकदा भांडण होते. 

मननने पोलिसांना सांगितले की, घरगुती वादाला कंटाळून तो शेजारी राहणाऱ्या त्याच्याच गावातील मुलीशी बोलू लागला. 2 वर्ष संवाद सुरू होता आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. मनन अन्सारीने आरोप केला आहे की, त्याचे पत्नीसोबत अनेकदा भांडण होते. त्यामुळे त्याला पत्नीसोबत राहायचे नाही. त्याने सांगितले की त्याला त्याच्या मैत्रिणीसोबत लग्न करायचे आहे. तर मुलीनेही मननशी लग्न करणार असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे, पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर करून वैद्यकीय तपासणीसाठी सदर रुग्णालयात पाठवले आहे.

एसडीपीओ संजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रौढ आहेत आणि स्वखुशीने घर सोडून पळून गेले होते. मनन अन्सारीच्या पत्नीने कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. जबाब नोंदवण्यासाठी प्रियकर-प्रेयसीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. या प्रेमप्रकरणाची आणि अपहरणाच्या घटनेची चर्चा दिवसभर गावात सुरू होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्न