शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

धक्कादायक! लग्नासाठी मागे लागली होती प्रेयसी, प्रियकराने दिलं नदीत ढकलून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:34 IST

आंध्र प्रदेश पोलीस तरूणीच्या शोधात सहारनपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी घटनेचा खुलासा केला. 

उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील खाताखेडी येथे राहणारा तरूण विजयवाडा आंध्र प्रदेशातील तरूणीला लग्नाचं आमिष दाखवून सहारनपूरमध्ये घेऊन आला. तरूणीने लग्नाचा तगादा लावला तर तो तिला फिरण्यासाठी म्हणून यमुना नदीवर घेऊन गेला आणि तिला नदीत ढकलून दिलं. अशात आंध्र प्रदेश पोलीस तरूणीच्या शोधात सहारनपूरमध्ये पोहोचले. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी घटनेचा खुलासा केला. 

आंध्र प्रदेश आणि मंडीच्या पोलिसांनी मिळून तरूणीचा मृतदेह शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन केलं. मात्र, मृतदेह काही सापडला नाही. पोलिसांनी आरोपीकडून तरूणीचं दहा तोळे सोनं ताब्यात घेतलं. खाताखेडी येथे राहणारा आसिफ हा विवाहित आहे. काही दिवसांपूर्वी त्याची ओळख विजयवाडा येथील २४ वर्षीय  तस्लीमा सोबत झाली होती. दोघांची मैत्री झाली आणि ते फोनवर बोलू लागले होते. (हे पण वाचा : Shocking! डॉक्टरने स्पर्म बदलून शेकडो महिलांना केलं प्रेग्नेन्ट, असा झाला खुलासा....)

काही दिवसांपूर्वी आसिफ एका मित्रासोबत तस्लीमाला दिल्लीत भेटला आणि तिला कारमध्ये बसवून सहारनपूरला आणलं. वेगवेगळ्या ठिकाणी रूम भाड्याने घेऊन त्याने तिला ठेवलं. तरूणी तिच्यासोबत १० तोळे सोन्याचे दागिने घेऊन आली होती. तिकचे तरूणीच्या कुटुंबीयांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. कॉल डीटेल्सच्या आधारावर आंध्र प्रदेश पोलीस सोमवारी सकाळी सहारनपूरच्या कोतवाली मंडीला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी आसिफ आणि त्याच्या मित्राला अटक केली. चौकशीत आसिफने तस्लीमाला नदीत धक्का दिल्याचं मान्य केलं. (हे पण वाचा : अंडरगारमेंट्समधून ड्रग्स घेऊन जात होती १९ वर्षीय डीलर, पोलिसांनी पकडलं तेव्हा झाले हैराण)

पोलीस चौकशी आरोपींनी सांगितलं की, तस्लीमा आसिफसोबत लग्नासाठी तगादा लावत होती. पण तो आधीच विवाहित होता. त्याने तस्लीमाला सांगितलं की, तो आधी त्याच्या पत्नीला घटस्फोट देणार आणि मग तिच्यासोबत लग्न करणार. यानंतर आसिफने मित्रासोबत मिळून तस्लीमापासून पिच्छा सोडवण्यासाठी प्लॅन केला. आसिफ आणि तैय्यब तरूणीला फिरायला घेऊन गेले. तिथे त्यांनी तरूणीसोबत फोटो काढले. त्यानंतर तिघेही घरी परत आले. 

१८ जुलैला पुन्हा त्याच ठिकाणी ते फिरायला गेले. इथे आसिफने तिला यमुना नदीत ढकललं. अजूनही तरूणीचा मृतदेह सापडलेला नाही. आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे. तसेच तरूणीच्या मृतदेहाचाही शोध घेतला जात आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी