शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

"मी रेल्वे राज्यमंत्री आहे…", भामट्याने पैसे घेतले आणि तरुणांना दिली बनावट नियुक्तीपत्रे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2023 11:58 IST

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका भामट्याने नोकरीच्या नावाखाली २० हून अधिक बेरोजगारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. आरोपीने रेल्वे राज्यमंत्री असल्याचे भासवून ही फसवणूक केली आहे. पैसे घेतल्यानंतर आरोपीने प्रत्येकाला जॉईनिंगची तारीख सांगून नियुक्तीपत्रेही दिली. त्यावेळी नोकरीसाठी पीडित तरुणांनी संबंधित कार्यालय गाठले असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर सर्व पीडितांनी बरेली पोलिसांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने २० हून अधिक तरुणांची फसवणूक केली आहे. रेल्वे राज्यमंत्री असल्याचे सांगून आरोपींनी प्रत्येकाकडून प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले. एवढेच नाही तर आरोपीने प्रत्येकाला जॉईनिंगची तारीख सांगणारे नियुक्तीपत्रही दिले आहे. हे नियुक्तीपत्र घेऊन तरुणांनी संबंधित कार्यालय गाठले असता त्यांना आपल्यासोबत झालेल्या फसवणुकीची माहिती मिळाली. यानंतर या पीडित तरुणांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. बरेली एडीजींच्या तक्रारीनंतर इज्जत नगर पोलिस ठाण्यात एकूण ११ फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बरेली येथील शिव स्टेट कॉलनीमध्ये राहणारे विनोद कुमार यांनी यासंदर्भात तक्रार दिली आहे. एअरफोर्स स्टेशनजवळ विनोद कुमार यांचे दुकान आहे. २०१८ मध्ये विजेंदर पाठक नावाचा एक व्यक्ती त्यांच्या दुकानात आला होता. रेल्वे भरती बोर्डाचे अध्यक्ष आणि रेल्वे राज्यमंत्र्यांचे विश्वासू असल्याचे विनोद कुमार यांनी त्या व्यक्तीने सांगितले होते. तसेच, मंत्रिपदाच्या कोट्यातून रेल्वेत नोकरी मिळू शकेल, असे आश्वासन दिले होते. आपला मुलगा मयंक आणि अन्य एका व्यक्तीच्या मुलाच्या नियुक्तीपत्रासह रेल्वेचा पासही दाखवला. तसेच, आता टीसीची अनेक पदे रिक्त असून ती भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचेही संबंधीत व्यक्तीने विनोद कुमार यांना सांगितले होते.

आरोपीने विनोद कुमार यांना फसवण्यासाठी मयंक आणि करण शर्मा यांच्याशीही ओळख करून दिली. त्यावेळी करणने स्वत: संसदीय रेल्वे कार्यात असल्याचे सांगत ओळखपत्रही विनोद कुमार यांना दाखवले. यानंतर अजय गुप्ता, निशा गुप्ता आणि शिवाजी सिंह फौजी यांच्याशी विनोद कुमार यांची चर्चा झाली. तेव्हा अजय आणि निशा यांनी स्वत:ला अधिकारी तर शिवाजी सिंह फौजी यांनी स्वत: रेल्वे राज्यमंत्री असल्याचे सांगितले होते. यानंतर विनोद कुमार यांनी आरोपींना नोकरीसाठी १५ लाख रुपये दिले.

विनोद कुमार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याशिवाय आरोपींनी इतर २० हून अधिक लोकांची फसवणूक केली होती. काही दिवसांनी आरोपीने सर्वांना नियुक्तीपत्रे वगैरे देऊन नियोजित तारखेला नोकरीवर रुजू होण्यास सांगितले. तेव्हा पीडितांनी सांगितले की, जेव्हा ते आपले नियुक्तीपत्र घेऊन संबंधित कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना हे पत्र बनावट असल्याचे समजले. यानंतर पीडितांनी एडीजींकडे तक्रार केली. आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशrailwayरेल्वेfraudधोकेबाजी