शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नागपुरातील प्लॉट खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवणूक; पाच लाखांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:06 IST

अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

ठळक मुद्देआनंद गोमाजी चव्हाण रा. गायत्री नगर यांनी या दोघांची भेट घेऊन २१ डिसेंबर २०११ रोजी १ हजार ७४३ चौरस मीटर प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. ४ लाख ३५ हजार ९०२ रुपये बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून दर महिन्याच्या किस्तीद्वारे रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सकडे जमा केले. त्यानंतरही खरेदी करून न दिल्याने चव्हाण यांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो परत आला.

अकोला : नागपूर येथील रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने नागपूर जिल्ह्यातील कान्होलीबारा शेतशिवारातील प्लॉट किस्तीद्वारे विक्रीस असल्याची जाहिरात देऊन अकोल्यातील ग्राहकाची तब्बल पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्यामुळे ग्राहक मंचाने सदर ग्राहकास रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.नागपूर येथील लक्ष्मी नगर चौकातील रहिवासी सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे यांची मे. रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी असून, या कंपनीचे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात असलेल्या कान्होलीबारा परिसरातील प्लॉट विक्रीस उपलब्ध असल्याची जाहिरात अकोल्यातील वर्तमानपत्रात दिली. आनंद गोमाजी चव्हाण रा. गायत्री नगर यांनी या दोघांची भेट घेऊन २१ डिसेंबर २०११ रोजी १ हजार ७४३ चौरस मीटर प्लॉट खरेदीचा व्यवहार केला. त्यानंतर ४ लाख ३५ हजार ९०२ रुपये बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून दर महिन्याच्या किस्तीद्वारे रेवती असोसिट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सकडे जमा केले. त्यानंतर प्लॉट खरेदी करण्यासाठी विनंती केली असता सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे या दोघांनी त्यांची टाळाटाळ सुरू केली. चव्हाण यांनी मोरे यांची भेट घेऊन तक्रार करण्याचे म्हणताच मोरे दाम्पत्याने त्यांना त्यांचा प्लॉट २५ डिसेंबर २०१६ पूर्वी खरेदी करून देणार असल्याचे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले व खरेदी न केल्यास एक धनादेश दिला; मात्र त्यानंतरही खरेदी करून न दिल्याने चव्हाण यांनी धनादेश बँकेत वटविण्यासाठी लावला असता तो परत आला. त्यामुळे आनंद चव्हाण यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्रात धाव घेतली. यावर मोरे दाम्पत्याने तडजोड करण्यासाठी जिल्हा ग्राहक मंचात उपस्थित राहणार असल्याचे आश्वासन दिले; मात्र उपस्थित राहिले नाही. जिल्हा ग्राहक मंचाने सुहास रत्नाकर मोरे, विद्या सुहास मोरे यांच्या मे. रेवती असोसिएट्स अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्सने आनंद चव्हाण यांना ४ लाख ८६ हजार ९०२ दोन रुपये १० टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश दिला. यासोबतच १० हजार रुपये मानसिक त्रासापोटी देण्याचेही आदेशात नमूद आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाnagpurनागपूरCrimeगुन्हाconsumerग्राहक