शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर! एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 3 दिवसांत झालेल्या घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 10:07 IST

Crime News : गावात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली - बिहारच्या (Bihar) चंपारणमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका रहस्यमयी आजारामुळे तीन दिवसात घरातील एक एक करीत सर्वांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे. मोतिहारीमधील मुफ्फसिल पोलीस ठाणे हद्दीत ही भयंकर घटना घडली आहे. सातत्याने होत असलेल्या मृत्यूच्या घटनेनंतर गावकऱ्यांनी आक्रोश व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी शनिवारी मोतिहारी पकडीदयाल मार्ग काही वेळासाठी रोखून धरला होता. मात्र डॉक्टरांनी समजवल्यानंतर लोक शांत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुफ्फसिल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात दहशत पसरली आहे. डॉक्टर श्रवण पासवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसात पाच आणि गेल्या सहा महिन्यात या कुटुंबातील 8 सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितलं की, या कुटुंबाच्या घराच्या मागे एक भलमोठं झाड होतं. जे सहा महिन्यांपूर्वी पडलं होतं. कुटुंबीयांनी त्यांना सांगितलं की, त्यानंतर या घरात मृत्यूच्या घटना सुरू झाल्या आहेत.

मृतदेहांच्या नाका-तोंडातून येत होता फेस

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, झाड पडल्यानंतर कुटुंबीय भुताचा काहीतरी परिणाम आहे असं मानून तांत्रिकाकडे गेले आणि त्याच्याकडून उपचार करू लागले. डॉक्टर श्रवण पासवान यांनी सांगितलं की, आज झालेल्या मृत्यू प्रकरणातील मृतदेहांच्या नाका-तोंडातून फेस येत होता आणि एका मृतदेहाच्या कानातून रक्त निघत होता. सर्पदंश किंवा विष घेतल्यामुळे असं झाल्याची शक्यता आहे. पोस्टमार्टम रिपोर्टनंतर याबाबत नेमका खुलासा होईल असं डॉक्टरांनी म्हटलं आहे. 

गेल्या सहा महिन्यांत 8 लोकांचा मृत्यू

डॉक्टरांनी सांगितलं की, महासाथीच्या तज्ज्ञांनी संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ते मृत्यूच्या कारणाचा शोध घेत आहे. मृत व्यक्तीचं कुटुंबीय सीता देवा आणि सरिता देवी यांनी सांगितलं की, पोटदुखीनंतर गळ्यात वेदनाच्या तक्रारी जाणवत होत्या, त्यानंतर काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. मृत प्रियांशचे वडील राकेश प्रसाद यांनी सांगितलं की, गेल्या सहा महिन्यांत 8 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह हे पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच य़ा प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :BiharबिहारDeathमृत्यूPoliceपोलिसdoctorडॉक्टर