शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

५०० हुन अधिक गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शेठजी विरोधात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2020 20:26 IST

बेकायदा भिशी चालवून तसेच कमी कालावधीत दामदुपट्ट रक्कम देतो अशी बतावणी करून केली फसवणूक..

ठळक मुद्देयाप्रकरणी लोणी काळभोर पोलिसात पहिला गुन्हा शुक्रवारी रात्री उशिरा दाखल

उरुळी कांचन : बेकायदा भिशीत गुंतवणुकीच्या नावाखाली लोणी काळभोर, उरुळी कांचन, कुंजीरवाडीसह पूर्व हवेलीमधील पाचशेहुन अधिक "बड्या" गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. यात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील हिरेन भरतकुमार जोशी या "शेठ" सह त्याच्या दोन नातेवाईकांनी बेकायदा भिशी चालवून तसेच कमी कालावधीत दामदुपट्ट रक्कम देतो अशी बतावणी करून फसवणूक केली होती.  याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसात पहिला गुन्हा शुक्रवारी (ता. २५) रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.                  लोणी काळभोर येथील गोदाम व्यावसायिक ज्ञानेश्वर नारायण काळभोर (वय- ५५ वर्षे, रा. धुमाळ मळा रोड, लोणी काळभोर, ता.हवेली) यांनी हिरेन भरतकुमार जोशी याच्यासह, वडील, भरतकुमार चरणदास जोशी व  भाऊ दिपक भरतकुमार जोशी ( रा. तिघेही, उरुळी कांचन ता. हवेली) यांच्या विरोधात भिशीमधील गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याची तक्रार दिली आहे.  भरतकुमार यांनी आपल्या मुलांशी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या कुंटुंबियाला त्यांच्याकडे ७ वर्षांच्या कालावधीत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवले. तसाच त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी ९९,७९,७५०/- रू घेत कुठलाही परतावा न देता विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

                दरम्यान बेकायदा भिशीत गुंतवणुकीच्या व कमी कालावधीत रक्कम दामदुपट्ट देतो या नावाखाली उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका नामांकित व्यापाऱ्याने लोणी काळभोर, उरुळी कांचन, हडपसरसह पुर्व हवेलीमधील पाचशेहुन अधिक "बड्या" गुंतवणुकदारांच्याकडुन दोनशे कोटीहुन अधिक रुपयांची माया गोळा करुन पलायन केल्याबाबतची बातमी लोकमतने ४ दिवसापुर्वी प्रसिध्द केली होती.

             हिरेन जोशी हा मागील सात वर्षापासुन उऱुळी कांचन व परीसरात बेकायदा भिशीचा व्यवसाय चालवत आहे. भिशीत पैसे लावल्यास, सदर पैशावर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवल्याने पुर्व हवेलीमधील अनेकांनी जोशी यांच्याकडे कोट्यवधी रुपये गुंतवले आहेत. सुरुवातीला गुंतवणुकदारांना परतावा वेळच्यावेळी मिळत होता. मात्र मागील काही दिवसापासुन परतावा मिळणे बंद झाल्याने गुंतवणुकदारात मोठी खळबळ उडून आपले पैसे बुडाल्याची भावना निर्माण झाली होती. गुंतवणुकदार वसुलीसाठी घरी येत असल्याचे लक्षात येताच शेठ व त्याच्या घरातील सदस्यांनी पलायन केले.            याबाबत अधिक माहिती देताना, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले, भिशीचालक जोशी कुटुंबातील तिघांविरोधात गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याच्या नावाखाली एक कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. जोशी कुटुंबीयांनी वरील फसवणुक मागील सात वर्षाच्या काळात केलेली आहे. जोशी याच्या विरोधात आणखी काही जणांनी लेखी स्वरूपात तक्रारी दिलेल्या आहेत.

टॅग्स :uruli kanchanउरुळी कांचनfraudधोकेबाजीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी