शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Suicide : कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:41 IST

Farmer Suicide : मांजरा नदीवरील बॅरेजमध्ये तरुण शेतकऱ्याने घेतली उडी

येरोळ (जि. लातूर) : डोंगरगाव (ता. शिरुर अनंतपाळ) येथील एका शेतकऱ्याने बॅकेच्या कर्जाची कशी परतफेड करावी, या आर्थिक विवंचनेतून डोंगरगाव बॅरेजमध्ये उडी घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे. अजीत विक्रम बन (२४) असे मयत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, शिरूरअनंतपाळ तालुक्यातील डोंगरगाव येथील अजीत विक्रम बन यांची मांजरा नदीलगत शेती आहे. मात्र, अतिवृष्टीच्या पावसाने त्यांच्या शेतीतील सोयाबीन, उसाचे पिकच पूर्णत: वाहून गेले. शिवाय, जमीनही वाहून गेल्याने शेतीचे माेठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीबाबत माजी मंत्री आ. संभाजी पाटील-निलंगेकर, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., शिरुर अनंतपाळ येथील तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. अतीवृष्टीने शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वारंवानर करण्यात आली हाेती. अजीत बन यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी काही नातेवाईक, मित्र आणि बॅंकेकडून पीककर्ज घेतले होते. याच कर्जावर त्यांनी शेतातील पेरणी केली हाेती. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकही हातातून गेले. त्याचबरोबर मागील वर्षभरापासून कोरोना महामारीने सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे ते सतत पिककर्जाची परतफेड कशी करावी? या आर्थिक विवंचनेत हाेते. यातूनच अजीत बन या तरुण शेतकऱ्याने दिवाळी सणामध्ये भाऊबीजदिवशी डाेंगरगाव येथील बॅरेजमध्ये उडी घेत आत्महत्या केली, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. अजीत बन यांच्या पश्चात वयोवृध्द आजी, आई-वडील, भाऊ, पत्नी, एक दीड वर्षाची मुलगी आहे. याबाबत शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार दयानंद वासुदेव तपास करीत आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरfarmer suicideशेतकरी आत्महत्याPoliceपोलिस