शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाने हूल दिल्याने तिबार पेरणीचं संकट, शेतकरी दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 20:05 IST

farmer suicide: पावसाने डोळे वटारल्याने तिबार पेरणीच्या संकट ओढावल्याने तालुक्यातील कारखेड येथील शेतकरी दाम्पत्याने ७ जुलैच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास विषारी औधष प्राशन केले होते.

चिखली - पावसाने डोळे वटारल्याने तिबार पेरणीच्या संकट ओढावल्याने तालुक्यातील कारखेड येथील शेतकरी दाम्पत्याने ७ जुलैच्या रात्री ११ वाजेच्या सुमारास विषारी औधष प्राशन केले होते. या दाम्पत्यावर जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असताना ८ जुलैच्या रात्री ९ च्या सुमारास पतीचा तर रात्री दोनच्या सुमारास पत्नीचा मृत्यू झाला आहे.

तालुक्यातील कारखेड येथील शेषराव भगवान मंजुळकर (६०) आणि जनाबाई शेषराव मंजुळकर (५१) या शेतकरी दाम्पत्याने तिबार पेरणीचे सकंट उद्भवल्याने आलेल्या नैराश्यातून आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेत ७ जुलैच्या रात्री विषारी औषध प्राशन केले होते. त्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान ८ जुलैच्या रात्री ९ व २ वाजेच्या सुमारास एकापाठोपाठ एक याप्रमाणे या शेतकरी दाम्पत्यांची प्राणज्योत मालवली. मृतक शेतकरी दाम्पत्याकडे केवळ दोन एकर शेती होती. गाठीशी असलेले सर्वकाही पणाला लावून त्यांनी पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही. त्यामुळे उसनवारी करून दुबार पेरणी त्यांना करावी लागली होती. मात्र, दुसऱ्यांदाही पेरणी उलटल्याने हे शेतकरी दाम्पत्य तणावाखाली होते. त्यातच मृतक जनाबाई मंजुळकर यांना अर्धांगवायुचा देखील त्रास होता. मात्र, कसेबसे जीवन कंठत असताना निर्सगाने घोर निराशा केल्याने आलेल्या नैराश्येतून त्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपविण्याचा निर्णय घेतला होता. मृतक शेतकरी दाम्पत्यास दोन मुले व चार मुली आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या