शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

बच्चू कडूंच्या नावे चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या; पोलीस अन् व्यापाऱ्यांनी मारहाण केल्याचे नमूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 21:25 IST

Farmer Suicide : अंजनगाव सुर्जीच्या सहायक पोलीस निरीक्षक, व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देशालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास तालुक्यात उघड झाली.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : संत्र्याच्या व्यवहारात व्यापाऱ्याने केलेली फसवणूक व त्यापाठोपाठ पोलिसांनी केलेल्या मारहाणीची माहिती शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास तालुक्यात उघड झाली.अशोक पांडुरंग भुयार (५५, रा. धनेगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मंगळवारी सायंकाळी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक दीपक श्रावण जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर (दोघेही रा.अंजनगाव सुर्जी) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील बोराळा येथे गणपती मंदिराच्या परिसरातील शेतात एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मंगळवारी दुपारी अंजनगाव पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर संबंधिताने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे लक्षात आले. मृतदेहाची झडती घेतली असता, त्यांच्या कपड्यात एका पानाची चिठ्ठी आढळली. त्यावरून मृत व्यक्तीची अशोक भुयार अशी ओळख पटली. यानंतर त्यांना संत्रा व्यापारी व अंजनगाव पोलिसांकडून मारहाण करण्यात आली, पोलिसांनी त्यांची फिर्याद नोंदवून न घेता परत पाठविले, ही माहिती उघड झाली. त्यांनी ही संपूर्ण माहिती ना. बच्चू कडू यांच्या नावे न्याय मिळण्याच्या हेतूने लिहून ठेवली. भुयार यांनी आपल्यावरील अन्यायाची माहिती राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नावे लिहून ठेवल्याने थंडीतही राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे.

चिठ्ठीत काय?शेतकरी अशोक भुयार यांनी त्यांच्या धनेगाव येथील शेतातील संत्री अंजनगाव सुर्जी येथील दोन व्यापाऱ्यांना विकण्याचा व्यवहार केला. मात्र, त्या दोन व्यापाऱ्यांनी भुयार यांना शेतामध्ये दारू पाजून संत्राविक्रीचे पैसे न देता पावतीवर जबरदस्तीने सही घेतली. मारहाणदेखील केली. त्याबाबतची तक्रार देण्यास ते धनेगाव येथील पोलीस पाटलासह अंजनगाव पोलीस ठाण्यात १८ डिसेंबर रोजी गेले असता, त्याठिकाणी बीट जमादार व ठाणेदाराने बेदम मारहाण केली, असे लिहून त्याखाली अशोक भुयार यांनी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी केली आहे.

पोलीस ठाण्यात जमावशेतकऱ्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ठाणेदार व बीट जमादाराविरुद्ध गून्हा दाखल करण्याची मागणी संतप्त जमावाने केली. मंगळवारी दुपारपासूनच ठाण्यातील वातावरण कमालीचे चिघळले होते. अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी तातडीने अंजनगाव पोलीस ठाणे गाठले. ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक पोलीस अधिकारी शेतकरी भुयार यांना मारहाण करीत असल्याचे दिसून आले. यामुळे गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका संतप्त नागरिकांनी घेतली. त्यानंतर मृताचा मुलगा गौरव अशोक भुयार याच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक दीपक जाधव व संत्रा व्यापारी शेख अमीन आणि शेख गफूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

 

प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे दिला आहे. मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक व दोन संत्रा व्यापाऱ्यांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविला.- श्याम घुगे, अपर पोलीस अधीक्षक

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीAmravatiअमरावतीBachhu Kaduबच्चू कडूPoliceपोलिसPoliticsराजकारण