शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 12:30 IST

भारती दीक्षित सध्या वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत तर आशिष मोदी सामाजिक न्याय विभागात संचालक आहेत.

जयपूर - राजस्थान कॅडरचे २ ज्येष्ठ IAS अधिकाऱ्यांमधील कौटुंबिक कलह आता सगळ्यांसमोर आला आहे. २०१४ च्या बॅचमधील महिला आयएएस अधिकारी भारती दीक्षित यांनी पती आशिष मोदी यांच्याविरोधात जयपूरच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. भारती यांनी पतीवर घरगुती हिंसाचार, मारहाण, अवैधपणे बंधक बनवणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि बळजबरीने घटस्फोटासाठी दबाव टाकणे यासारखे गंभीर आरोप केले आहेत. 

सध्या हे प्रकरण प्रशासनात चर्चचा विषय बनला आहे. कारण दोघेही पती-पत्नी उच्चपदस्थ अधिकारी आहेत. भारती दीक्षित सध्या वित्त विभागात संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत तर आशिष मोदी सामाजिक न्याय विभागात संचालक आहेत. पोलिसांनी भारती यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात तपासासाठी टीम बनवण्यात आली आहे. दोन्ही बाजूचे जबाब, साक्षीदार आणि पुरावे यांची पडताळणी सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

या वादाचं कारण म्हणजे १४ ऑक्टोबर २०२५ रोजी एक घटना घडली. भारती दीक्षित यांनी सांगितले की, मी सकाळी माझ्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेली होती. रस्त्यात आशिष मोदी आणि त्यांच्या आणखी एका साथीदाराने सरकारी वाहनाचा वापर करून मला जबरदस्तीने त्यात बसवले. त्यानंतर शहरातील एका निर्जनस्थळी असलेल्या इमारतीच्या फ्लॅटमध्ये मला कित्येक तास बंधक बनवले. आशिष मोदी यांनी त्यावेळी दारू प्यायली होती. ते मला शिवीगाळ करत होते. त्यावेळी आशिष मोदी यांनी बळजबरीने माझ्याकडून कागदावर स्वाक्षरी करून घेत घटस्फोटासाठी दबाव टाकला असा आरोप केला. जेव्हा स्वाक्षरी करण्यास नकार दिला तेव्हा एका शूटरला बोलावून मला जीवे मारण्याची धमकी दिली. इतकेच नाही तर बंदुकीच्या धाकावर माझ्या वडिलांसोबत मला खोटे बोलण्यास भाग पाडले. माझी प्रतिमा मलिन होईल अशा शब्दात मला धमकावण्यात आले, माझा मानसिक छळ करण्याचा प्रयत्न केला असेही भारती यांनी सांगितले.

इमोशनल ब्लॅकमेल करत केले लग्न

२०१६ मध्ये मला इमोशनल ब्लॅकमेल करत माझ्याशी लग्न करण्यात आले. माझ्या वडिलांची तब्येत बिघडली होती. आशिष मोदी यांनी त्याचा फायदा घेत माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला. लग्नानंतर मला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागले. आशिष मोदी यांचे अनेक महिलांशी संबंध आहेत. ज्याचे पुरावेही माझ्याकडे आहेत. वारंवार घटस्फोटासाठी माझ्याकडे दबाव टाकत होता, परंतु मी नकार देत असल्याने हिंसाचार वाढत गेला असं भारती दीक्षित यांनी म्हटलं.

दरम्यान, संबंधित प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. त्यामुळे मी यावर काय बोलणार नाही. पोलिसांना तपासात सहकार्य करेन असं सांगत आशिष मोदी यांनी पत्नीने केलेले आरोप फेटाळले. जेव्हा माझ्यावर FIR दाखल करण्यात आला तेव्हा मी बिहार दौऱ्यावर होतो असंही त्यांनी सांगितले. आता तपासात भारती यांचे पुरावे किती खरे आहेत, आशिष मोदी त्यांची बाजू कशी मांडतात हे कोर्टात दिसेल. सध्या पोलीस या हायप्रोफाईल कौटुंबिक वादावर तपास करत आहेत.  

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारPoliceपोलिस