शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

मुलावर वशीकरण करून सासूने पळवून नेले, जाताना...; सासू-जावई लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:22 IST

आधीसारखा इतरांमध्ये मिसळून राहणारा राहुल आता गप्प गप्प राहत होता असं त्याच्या वडिलांनी आरोप केला.

उत्तर प्रदेशच्या अलीगड येथे सासू आणि जावयाच्या लव्ह स्टोरीत नवा ट्विस्ट आला आहे. एकीकडे पोलीस या दोघांचा शोध घेत आहे तर दुसरीकडे मुलाच्या कुटुंबीयांकडून सासूवर जादूटोणा करून मुलाला ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. या दोघांची लव्ह स्टोरी लग्नाची बोलणी सुरू झाल्यापासून झाली होती. सासू मुलाच्या घरी आली होती तेव्हा तिने मुलाला तावीज बांधून वशीकरण केले असं मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे.

सासू आणि जावयाच्या प्रेमकहाणीत आता तिसऱ्या व्यक्तीचीही एंट्री, समोर आली अशी माहिती 

मछलिया गावात राहणाऱ्या राहुलचं मनोहरपूर येथे राहणाऱ्या जितेंद्र यांच्या मुलीसोबत लग्न ठरलं होते. दोघांच्या घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्यातच लग्नाला ८ दिवस शिल्लक असताना नवरदेव सासूला घेऊन घरातून पळाला. त्यानंतर दोघांच्या घरच्यांना धक्का बसला. आता राहुलचे वडील ओमवीर यांनी यावर प्रतिक्रिया देत सासूवर गंभीर आरोप लावले आहेत. राहुलचे वडील म्हणाले की, होळीच्या आधी मुलाची सासू आमच्या घरी आली होती. ती ५ दिवस इथेच थांबली. त्यानंतर घरातील सर्व काही बदलायला लागले. सासूने राहुलच्या शरीरावर तावीज बांधले होते. एक तावीज त्याच्या हातावर आणि दुसरे कमरेला बांधले होते. तावीज बांधल्यापासून राहुलच्या वागणुकीत बदल झाला. तो कुटुंबापासून अंतर बाळगत होता. आधीसारखा इतरांमध्ये मिसळून राहणारा राहुल आता गप्प गप्प राहत होता असं त्याच्या वडिलांनी आरोप केला.

राहुलच्या डोळ्यात एकटेपणा आणि चेहऱ्यावर परकेपणा दिसत होता. हे बदल नेमके कशामुळे झालेत हे कुटुंबाला कळले नाहीत. परंतु सासू आल्यापासून त्याच्यात बदल झाले ते वडिलांना दिसले. सासूने मुलावर जादूटोणा केला त्यामुळे मुलगा तिच्या ताब्यात गेला. त्याच्यावर वशीकरण करण्यात आले होते. राहुल घरच्यांचे ऐकायचे मात्र सासू घरी आल्यापासून तो पूर्णत: बदलला होता. माझा मुलगा घरातून ५० हजार आणि दागिनेही घेऊन पळून गेला असंही राहुलचे वडील ओमवीर यांनी म्हटलं.

दरम्यान, माझा मुलगा आता माझ्यासाठी मेलाय, मी त्याला संपत्तीतून काढून टाकलंय. आम्ही त्याला घरातही पाऊल ठेवू देणार नाही. त्याने जे काही केले सासूमुळे केले असा आरोप राहुलच्या वडिलांनी केला. तर माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या होत्या. लग्नाच्या ८ दिवस आधीच सासूसोबत होणार जावई पळाला. आम्ही दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पत्नी घरातील ५ लाखांचे दागिने आणि ३ लाख रोकड घेऊन पळाल्याचा आरोप मुलीचे वडील जितेंद्र कुमार यांनी केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश