शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

फेक न्यूज पसरवण्यात व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकची आघाडी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2020 06:44 IST

राज्यात ५५२ गुन्ह्यांची नोंद

मनीषा म्हात्रे 

मुंबई : कोरोनाबाबत अफवांचे पीक वाढू लागले असून, त्याला धार्मिक रंग चढवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न जोर धरत आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून राज्यभरात तब्बल ५५२ गुन्हे नोंद झाले आहेत. यात बीडची आघाडी आहे. राज्याच्या सायबर विभागाने केलेल्या अभ्यासावरून सर्वाधिक अफवा व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरल्या जात असल्याचे स्पष्ट झाले. सद्यस्थितीत व्हॉट्सअ‍ॅपला मागे टाकत फेसबुकवरून अफवांचा जोर वाढत असल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या आकडेवारीतून पाहावयास मिळते आहे. त्यानुसार सायबर विभाग फेसबुकवरील हालचालींवर विशेष लक्ष ठेवून आहे.

या गुन्ह्यांचा अभ्यास करता त्यातील फेसबुकवर टाकलेल्या आक्षेपार्ह मजकुरावरून २३४ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याखालोखाल व्हॉट्सअ‍ॅपसंबंधित २०८ प्रकरणे आहेत. तर यात टिष्ट्वटर १८, इन्स्टाग्राम ४ तर टिकटॉक २८ गुन्ह्यांचा समावेश आहे़ विविध कारवायांत २८८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

२३२ आरोपींची ओळख पटली असून, त्याबाबत अधिक तपास सुरू आहे. आतापर्यंत १४६ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर १२९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलीसपत्रकही व्हायरल...

याच काळात शासन आदेशाबरोबरच पोलीस पत्रकात फेरफार करत ते पत्रक व्हायरल करण्यात आले. त्यामुळेही गोंधळ निर्माण झाला होता.

सेलिब्रिटींना कोरोना झाल्याची जोरदार चर्चा

सेलिब्रिटी, राजकीय मंडळींसह नामांकित व्यक्तींना कोरोना झाल्याच्या अफवांनी जोर धरला.

११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट

सायबर पोलिसांकड़ून करण्यात आलेल्या विविध कारवायांत तब्बल ११८ आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी