शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

पंतप्रधानांच्या हत्येच्या कटाचा उल्लेख नाही; एल्गार परिषद प्रकरणी आरोपपत्र दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 8:42 AM

एल्गार परिषद प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आपल्या प्रस्तावित मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे की, या शस्त्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याशी संबंध आहे. मात्र, एनआयएने त्यांच्या मसुदा आरोपपत्रात पंतप्रधानांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : २०१८ च्या एल्गार परिषद - माओवादी संबंध प्रकरणातील १५ आरोपींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप सुरुवातीला या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी केला होता. त्यावरून देशात खळबळ माजली होती. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) विशेष न्यायालयात सादर केलेल्या मसुदा आरोपपत्रात आरोपींनी सरकारी अधिकाऱ्यांची हत्या करण्यासाठी शस्त्रास्त्रे जमविल्याचे म्हटले आहे. त्यात त्यांनी थेट पंतप्रधानांचा उल्लेख केलेला नाही.

एल्गार परिषद प्रकरणाचा प्राथमिक तपास करणाऱ्या पुणे पोलिसांनी आपल्या प्रस्तावित मसुदा आरोपपत्रात म्हटले आहे की, या शस्त्रांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचण्याशी संबंध आहे. मात्र, एनआयएने त्यांच्या मसुदा आरोपपत्रात पंतप्रधानांच्या हत्येचा उल्लेख केलेला नाही. या १५ आरोपींविरोधात एनआयएने विशेष न्यायालयात मसुदा आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपींनी दहशतवादी कारवायांसाठी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ तर मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स (टिस) च्या विद्यार्थ्यांची भरती केल्याचा दावा एनआयएने यात केला आहे.

आरोपींवर यूएपीए व भारतीय दंडसंहितेअंतर्गत १६ वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहेत. त्यामध्ये देशाविरुद्ध युद्ध छेडल्याचा आरोपही ठेवण्यात आला आहे. या आरोपाखाली गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्याची तरतूद आहे.संबंधित १५ आरोपी हे बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेशी संबंधित आहेत. राज्यभरातील दलित आणि इतर वर्गाच्या सांप्रदायिक भावनांचे शोषण करण्यासाठी आणि राज्यात व पुणे जिल्ह्यात हिंसाचार, अस्थिरता, अराजकता निर्माण करण्यासाठी जातीच्या नावावर भडकविण्यासाठी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली. अत्याधुनिक शस्त्र एम-४ च्या वार्षिक पुरवठ्यासाठी आठ कोटी रुपयांची मागणी किंवा आयोजन करण्यासाठी कट रचला. तसेच दहशतवादी कारवाया अमलात आणण्यासाठी विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची भरती केली, असेही  एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चा