शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

ED Action on Xiaomi India: घोटाळेबाज! शाओमीवर ईडीची तगडी कारवाई! साडे पाच हजार कोटी जप्त केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2022 16:46 IST

शाओमी इंडिया ही चीनच्या शाओमीच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरू केली होती. जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात पडून होती. 

अलिकडे राजकारण्यांवरील कारवाईवरून चर्चेत आलेल्या ईडीने जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोन ब्रँडपैकी एक असलेल्या शाओमीवर मोठी कारवाई केली आहे. शाओमी टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड (Xiaomi India) चे 5551.27 कोटी रुपये जप्त केले आहेत. 

विदेशी मुद्रा व्यवस्थापन कायदा, 1999 च्या नियमांनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. शाओमी इंडिया ही चीनच्या शाओमीच्या संपूर्ण मालकीची कंपनी आहे. कंपनीने बेकायदेशीरपणे पैसे पाठवल्याप्रकरणी ईडीने या वर्षी फेब्रुवारीमध्ये चौकशी सुरू केली होती. जप्त केलेली रक्कम कंपनीच्या बँक खात्यात पडून होती. 

2014 मध्ये भारतात या कंपनीने आपला कारभार सुरु केला. तसेच २०१५ पासून चीनमध्ये पैसे पाठविण्यास सुरुवात केली. कंपनीने तीन विदेशी संस्थांना रॉयल्टीच्या नावाखाली 5551.27 कोटी रुपयांचे परकीय चलन पाठवले आहे. यात Xiaomi समुहाची एक संस्था देखील आहे. रॉयल्टीच्या नावाखाली एवढी मोठी रक्कम शाओमी ग्रुपच्या संस्थेच्या सूचनेनुसार पाठवण्यात आली. दुसऱ्या दोन कंपन्या अमेरिकेच्या जरी असल्या तरी त्याचा थेट लाभार्थी ही शाओमीच असल्याचे तपासात समोर आले आहे. 

Xiaomi India MI च्या ब्रँड नावाने भारतात मोबाईल फोनचा व्यापारी आणि वितरक आहे. शाओमी भारतातील निर्मात्यांकडून पूर्णपणे तयार केलेले मोबाइल सेट आणि इतर उत्पादने खरेदी करते. परंतू ज्या तीन संस्थांना शाओमीने पैसे पाठविले त्यांच्याकडून काहीच खरेदी किंवा सेवा घेतली जात नाही. FEMA च्या कलम 4 चे उल्लंघन करत बोगस कागदपत्रे दाखवून शाओमीने हा घोटाळा केला आहे.

टॅग्स :xiaomiशाओमीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय