शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

Delhi Violence : वाहत्या नाल्यात सापडले आणखी तीन मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2020 18:02 IST

Delhi Violence : आता या हिंसाचारात मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे.

ठळक मुद्दे हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 45 वर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.सध्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलीस प्रशासन मृतदेहांची ओळख पटवित आहे.

नवी दिल्लीदिल्लीतील हिंसाचार थांबलेला दिसत आहे, परंतु अद्याप परिस्थिती पूर्णपणे सामान्य झाली नाही. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारग्रस्त भागात अद्यापही सापडत असलेल्या मृतदेहामुळे लोक संतापले आहेत. रविवारी गोकुळपुरी भागात नाल्यातून १ आणि भागीरथी बिहारमधून दोन असे आणखी तीन मृतदेह सापडले. अशा प्रकारे आता या हिंसाचारात मृतांचा आकडा ४५ वर गेला आहे. दिल्लीतील हिंसाचारानंतर मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे.आज सकाळी ११ वाजता पहिला एक मृतदेह सापडला, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना दुपारपर्यंत एकूण तीन मृतदेह आढळून आले. गोकुळपुरी नाल्यातून एक आणि भागीरथी नाल्यातून दोन मृतदेह सापडल्याचे सांगण्यात आले. दुर्गंधी आल्यानंतर लोकांनी पोलिसांना कळविले, त्यानंतर शोध मोहीम राबवून पोलिसांनी तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. हिंसाचारातील मृतांचा आकडा आता 45 वर आला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे.

Delhi Violence : दंगलखोरांनी जवानाचे घर जाळले, बीएसएफमधील सहकारी मदतीस धावले

Delhi Violence:…तर आमचंही लिंचिंग झालं असतं! ACP नीं सांगितला तो भयानक प्रसंग

सध्या मृतदेहांची ओळख पटलेली नाही. पोलीस प्रशासन मृतदेहांची ओळख पटवित आहे. यापूर्वी विविध भागातील या नाल्यातून तीन मृतदेह सापडले आहेत. या नाल्यातून चांद बाग परिसरातून आयबी कॉन्स्टेबल अंकितचा मृतदेहही मिळाला. ईशान्य दिल्लीतील जाफराबाद, मौजपूर, बाबरपूर, चांदबाग, शिव विहार, भजनपुरा, यमुना विहारमध्ये हिंसाचारामुळे 42 जणांचा मृत्यू आणि 200 हून अधिक जखमी झाले. मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान झाले आहे. दरोडेखोरांच्या जमावाने घरे, दुकाने, वाहने आणि पेट्रोल पंप पेटवून स्थानिक आणि पोलिसांवर दगडफेक केली.हिंसाचारात वापरलेला रासायनिक कारखानादुसरीकडे, करावल नगर परिसरातील गोविंद विहार भागात सुमारे २० वर्षांपासून एक केमिकल फॅक्टरी सुरु आहे. कारखान्याजवळच एक खासगी शाळा देखील आहे. कारखाना बंद करण्यासाठी शाळेच्या वतीने अनेक तक्रारी करण्यात आल्या पण त्याबाबत ठोस कारवाई कधीच करण्यात आली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचाराच्या वेळी ही रासायनिक पुरवठा होती. जवळपासच्या दुकानदारांचे म्हणणे आहे की हिंसाचारापूर्वी काही लोक या कारखान्याला भेट देतच असतात. याशिवाय या भागात इतर कोणतेही रासायनिक कारखाने नाहीत.

हिंसाचाराच्या आगीत शिव विहार नष्ट झालाहिंसाचाराच्या आगीत शिव विहार पूर्णपणे नष्ट झाला आहे. परिसरातील घरांपासून ते दुकानेपर्यंत विनाशाचे ते भयानक दृश्य पाहिले गेले, या दृश्यांमुळे कोणाच्याही अंगावर शहरे येतील. शिव विहार मार्केटच्या आसपास अनेक घरे लॉक होती. लोक अजूनही भीतीच्या छायेत या भागात राहत आहेत. हिंसाचार शांत झाल्यानंतर दैनिक जागरणच्या पथकाने शनिवारी शिव विहार परिसराला भेट दिली. दंगलखोरांनी पेट्रोल बॉम्ब टाकले त्या प्रत्येक घरी जाऊन पथकाने पाहणी केली. आजपर्यंत या कॉलनीत कधीच किरकोळ भांडणही झाले नव्हते. तिथे आज इतकी मोठी दंगल झाली की संपूर्ण परिसर आता ओसाड पडला आहे. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसDeathमृत्यू