शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Delhi Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी ६ मार्चला उच्च न्यायालयात सुनावणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 13:34 IST

Delhi Violence : या हिंसाचारात ४० हून अधिक तर ठार आणखी अनेक जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाला जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे, असे भारताचे मुख्य न्यायमूर्ती  म्हटले आहे. उच्च न्यायालय सुनावणी करेल. यात कायदेशीर दाद मागण्याला आम्ही आडकाठी आणत नाही - सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसाचाराशी संबंधित याचिकांवर ६ मार्च रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणी पार पडणार आहेत. अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाला जास्तीत जास्त लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती केली आहे, असे भारताचे मुख्य न्यायमूर्ती  म्हटले आहे.गेल्या आठवड्यात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या (CAA) मुद्दय़ावरून ईशान्य दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या याचिकांची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता असून दिल्ली पोलिसांनी परिस्थिती व्यावसायिक पद्धतीने हाताळली नाही, अशा शब्दात ताशेरे ओढले होते. या हिंसाचारात ४० हून अधिक तर ठार आणखी अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांसह कायदा अंमलबजावणी संस्थांवर ताशेरे ओढताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, पोलिसांनी हिंसक जमावाला मोकळे रान दिले. त्यांनी कुणाच्या परवानगीची वाट न पाहता कारवाई करायला पाहिजे होती. जर कुणी प्रक्षोभक भाषण करीत असेल तर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. हिंसाचाराबाबतच्या याचिकांवर सुनावणी करण्यास नकार देताना न्यायालयाने सांगितले होते की, शाहीन बाग निदर्शनांच्या मुद्दय़ावर सुनावणी करण्यासाठी अनुकूल स्थिती असली पाहिजे.

Delhi Violence: काय घडलं होतं त्याक्षणी? पोलिसाने सांगितले, दंगलखोर शाहरुखने माझ्यावर पिस्तूल रोखलं तेव्हा...

 

Delhi Violence : कोण आहे शाहरुख?, त्याला कसं पकडलं?... दिल्ली पोलिसांनी सगळंच सांगितलं!

न्या.एस.ए. कौल व न्या. के.एम. जोसेफ यांनी सांगितले होते की, शाहीनबाग प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकांची व्याप्ती वाढवून त्यात हिंसाचाराशी संबंधित याचिकांची सुनावणी केली जाणार नाही. न्यायालयाने म्हटले होते की, आम्ही आमच्यासमोर सध्या जी याचिका आहे त्याच्या बाहेर जाणार नाही. हिंसाचाराच्या अनेक दुर्दैवी घटना झाल्या आहेत. शाहीनबाग येथे इतरांची गैरसोय करून लोकांनी आंदोलन करणे कितपत योग्य आहे यावर सध्या सुनावणी सुरू आहे. त्याच मुद्दय़ाचा आम्ही विचार करू, हिंसाचाराशी संबंधित याचिकांचा विचार आम्ही करणार नाही. त्यावर उच्च न्यायालय सुनावणी करेल. यात कायदेशीर दाद मागण्याला आम्ही आडकाठी आणत नाही, पण ती दाद उच्च न्यायालयाकडे मागावी. शाहीनबाग प्रकरणातील संवादक संजय हेगडे व साधना रामचंद्रन यांना न्यायालयाने सांगितले होते की, शाहीनबाग येथील लोकांनी तोडग्यासाठी पुढे आले पाहिजे. त्यानुसार आता दिल्ली उच्च न्यायालयात हिंसाचाराप्रकरणी याचिकांवर सुनावणी ६ मार्चला पार पडणार आहे. 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालयdelhiदिल्ली