शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पीएसआय परीक्षेसाठी पात्र ठरविलेल्या ‘त्या’उमेदवारांचा निर्णय प्रलंबितच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 21:02 IST

राज्य सरकारकडून निर्णय होत नसल्याने न्यायालयात धाव घेतली असताना त्याठिकाणी ‘तारीख पे तारीख’च्या चक्रात ते अडकले आहेत.

ठळक मुद्दे२०११ व २०१३ या परीक्षेतून पात्र ठरलेल्या खूल्या प्रवर्गातील ११९ उमेदवारांची ही व्यथा आहे. मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे आपल्याला कोणी वाली नसल्याने गृह विभागाकडून त्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली आहे, असा आक्षेप संबंधित उमेदवारांकडून घेण्यात येत आहे. 

मुंबई - त्यांच्याबरोबर उपनिरीक्षक पदाची परीक्षा देवून पात्र ठरलेले उमेदवार प्रशिक्षण देवून अधिकारी म्हणून रुजू झालेतरी त्यांच्या वाटेला मात्र अद्याप प्रतिक्षाच आहे. राज्य सरकारकडून निर्णय होत नसल्याने न्यायालयात धाव घेतली असताना त्याठिकाणी ‘तारीख पे तारीख’च्या चक्रात ते अडकले आहेत.२०११ व २०१३ या परीक्षेतून पात्र ठरलेल्या खूल्या प्रवर्गातील ११९ उमेदवारांची ही व्यथा आहे. पदोन्नतीतील आरक्षणाला छेद देत गुणवत्तेच्या आधारावर पीएसआयच्या प्रशिक्षणासाठी निवड होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र सामान्य प्रशासन व गृह विभाग यांच्यातील समन्वयाअभावी त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. तर महाराष्ट्र प्रशासकीय प्राधीकरणाच्या (मॅट) मध्ये सुरु असलेली याचिका अंतिम निर्णयाअभावी प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे त्यांच्यातून संताप व्यक्त होत आहे.राज्य लोकसेवा आयोगातर्फे खात्यातर्गत उपनिरीक्षक पदासाठीच्या परीक्षेतून गुणवत्तेवर पात्र ठरलेले पीएसआयच्या ११५ बॅँचचे १५२ उमेदवारांचा बुधवारी संचलन सोहळा झाला. बहुतांश उमेदवारांना वर्षभरासाठी त्यांच्या मूळ पोलीस म्हणून भरती झालेल्या घटकामध्ये पर्यवेक्षणार्थी पीएसआय म्हणून नियुक्ती देण्यात आल्या आहेत.आयोगातर्फे २०११ व २०१३ मध्ये अनुक्रमे ७७५ व १६४ पदाची परीक्षा झाली होती. त्यासाठी जाहिरात दिलेली पदे भरण्यात आली असलीतरी दरम्यानच्या काळात २०१४ मध्ये उच्च न्यायालयात दाखल विजय घोगरे यांच्या याचिकेवर पदोन्नतीवरील आरक्षण हे घटनाबाह्य असल्याचा निकाल देण्यात आला. त्यामध्ये आरक्षणाच्या कोट्यातून दिलेल्या नियुक्ती अवैध ठरवित त्याच परीक्षेत खूल्या प्रवर्गातील उमेदवारांची निवड गुणवत्तेनुसार करण्याचे आदेश देण्यात आले. त्याच्या कार्यवाहीसाठी राज्य सरकारला काही कालावधी देण्यात आल्यानंतर एका टप्यात काही उमेदवारांना परीक्षेत उर्तीण ठरवून प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले. मात्र अद्याप त्यातील ११९ उमेदवार प्रलंबित असून त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात गृह व सामान्य विभाग परस्पराकडे बोट करीत आहे. याप्रकरणी ‘मॅट’मध्ये दाखल असलेल्या खटल्यावर ३,४ जानेवारीला सलगपणे सुनावणी झाली. मात्र सोमवारी निकाल होण्याची अपेक्षा व्यक्त होत असताना त्याबाबतचा निकाल अनिश्चित काळापर्यत प्रलबिंत ठेवण्यात आला. दरम्यान २०१६मध्ये झालेल्या मर्यादित परीक्षेतील सर्व उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र तरीही त्यापूर्वी परीक्षा दिलेल्या पोलिसांच्याबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला आहे. मागासवर्गीय उमेदवारांप्रमाणे आपल्याला कोणी वाली नसल्याने गृह विभागाकडून त्याबाबतच्या प्रस्तावाची फाईल अद्याप प्रलंबित ठेवण्यात आली आहे, असा आक्षेप संबंधित उमेदवारांकडून घेण्यात येत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारMPSC examएमपीएससी परीक्षा