शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

बापरे! देशात ३० वर्षांत नक्षलवाद्यांकडून ५ हजारांवर आदिवासींची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:48 IST

5 thousand Adivasi murdered by naxalist in 30 yrs : पोलीस विभागाची माहिती, ग्रामसभेकडून वसूल करतात खंडणी

ठळक मुद्देनक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत.

गडचिरोली : ‘सत्ता ही बंदुकीच्या नळीतून हस्तगत होते’, या माओच्या तत्त्वानुसार काम करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गेल्या ३० वर्षांत देशभरात पाच हजारांवर आदिवासींची निर्घृण हत्या करून त्यांच्यात दहशत निर्माण केली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात मंगेझरी, मुरमुरी आणि जांभूळखेडा अशा विविध ठिकाणी त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात अनेक पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. असे असताना नक्षलवादी मानवाधिकारावर कोणत्या तोंडाने बोलत आहेत, असा सवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक (जनसंपर्क) डॉ. निलाभ रोहन यांनी उपस्थित केला आहे. नक्षलवाद्यांकडून सध्या पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांबाबत अपप्रचार करणारी पत्रके प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहन यांनी सदर पत्रक प्रसिद्धी माध्यमांना पाठवून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी पोलीस विभागाकडून काय प्रयत्न केले जात आहेत, आणि नक्षलवादी कसे आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे आणत आहेत, याची माहिती दिली. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित आहे. संविधानाच्या आधारेच स्थानिक आदिवासी नागरिकांना ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र त्याच ग्रामसभेकडून नक्षलवादी जबरदस्तीने खंडणी वसूल करतात, अशीही माहिती सदर पत्रकात देण्यात आली.

नक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घाबरून गेलेल्या नक्षलवाद्यांची मन:स्थिती बिघडली आहे. त्यातूनच ते पोलीस जवानांबाबत अपप्रचार करणारे तथ्यहीन पत्रकं प्रसारित करत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या कृतीबद्दल नागरिकांनी नक्षलवाद्यांचा निषेध करून सी-६० पथकातील जवानांचे अभिनंदन करावे, असे आवाहनही डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस