शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
2
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
3
PM Modi Birthday : जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
4
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
5
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
6
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
7
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
8
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
9
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
10
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
11
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
12
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
13
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
14
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
15
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
16
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
18
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
19
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
20
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली

बापरे! देशात ३० वर्षांत नक्षलवाद्यांकडून ५ हजारांवर आदिवासींची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 19:48 IST

5 thousand Adivasi murdered by naxalist in 30 yrs : पोलीस विभागाची माहिती, ग्रामसभेकडून वसूल करतात खंडणी

ठळक मुद्देनक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत.

गडचिरोली : ‘सत्ता ही बंदुकीच्या नळीतून हस्तगत होते’, या माओच्या तत्त्वानुसार काम करणाऱ्या नक्षलवाद्यांनी गेल्या ३० वर्षांत देशभरात पाच हजारांवर आदिवासींची निर्घृण हत्या करून त्यांच्यात दहशत निर्माण केली आहे. एवढेच नाही तर महाराष्ट्रात मंगेझरी, मुरमुरी आणि जांभूळखेडा अशा विविध ठिकाणी त्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात अनेक पोलीस जवानांना शहीद व्हावे लागले. असे असताना नक्षलवादी मानवाधिकारावर कोणत्या तोंडाने बोलत आहेत, असा सवाल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील पोलीस अधीक्षक (जनसंपर्क) डॉ. निलाभ रोहन यांनी उपस्थित केला आहे. नक्षलवाद्यांकडून सध्या पोलिसांच्या सी-६० पथकातील जवानांबाबत अपप्रचार करणारी पत्रके प्रसारित केली जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर डॉ. रोहन यांनी सदर पत्रक प्रसिद्धी माध्यमांना पाठवून आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी पोलीस विभागाकडून काय प्रयत्न केले जात आहेत, आणि नक्षलवादी कसे आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे आणत आहेत, याची माहिती दिली. भारतीय संविधान हे स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांवर आधारित आहे. संविधानाच्या आधारेच स्थानिक आदिवासी नागरिकांना ग्रामसभेच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या विकासासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे, मात्र त्याच ग्रामसभेकडून नक्षलवादी जबरदस्तीने खंडणी वसूल करतात, अशीही माहिती सदर पत्रकात देण्यात आली.

नक्षलवाद्यांच्या दहशतीतून आदिवासी नागरिकांना मुक्त करण्यासाठी व त्यांना संरक्षण देण्यासाठी सी-६० पथकाचे जवान प्रयत्न करत आहेत. त्यामुळे घाबरून गेलेल्या नक्षलवाद्यांची मन:स्थिती बिघडली आहे. त्यातूनच ते पोलीस जवानांबाबत अपप्रचार करणारे तथ्यहीन पत्रकं प्रसारित करत असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. या कृतीबद्दल नागरिकांनी नक्षलवाद्यांचा निषेध करून सी-६० पथकातील जवानांचे अभिनंदन करावे, असे आवाहनही डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस