शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! रत्नागिरीत २१ श्वानांना विष घालून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:17 IST

21 dogs were poisoned :  रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात.

ठळक मुद्देयाबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी परिसरातील सुमारे २१ श्वानांना खाण्यातून विष देऊन मारल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला़ हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील डाेंगरे गुरुवारी सकाळी आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी येथून जात असताना एका ठिकाणी श्वान मृतावस्थेत दिसले़ थाेडे पुढे गेल्यानंतर आणखी काही श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांनी पाहिले़ ते तसेच पुढे गेले असता आराेग्य मंदिर ते पटवर्धनवाडी या परिसरात तब्बल २१ श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसले़ या रस्त्यावर ठिकठिकाणी श्वानांना खाण्यासाठी चिकन व भात ठेवल्याचे त्यांनी पाहिले़ त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली़.

त्यांनी दिलेल्या या फिर्यादीत कुणीतरी अज्ञाताने श्वानांना जीव मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये काेणते तरी विषारी औषध टाकून ते श्वानांना खायला दिले़ त्यामुळेच या श्वानांचा मृत्यू झाल्याचे डाेंगरे यांनी म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पाेलिसांनी अज्ञातावर प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम १९६०चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करत आहेत.

निर्बिजीकरण माेहीम बंदरत्नागिरी शहरात श्वानांचे प्रमाण वाढल्याने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीनंतर रत्नागिरी नगर परिषदेने श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची माेहीम हाती घेतली हाेती़. या माेहिमेवर आतापर्यंत ४६ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दाेन वर्षापासून काेराेनामुळे ही माेहीम बंद आहे़ त्यामुळे श्वानांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हत्या मागचे कारण काय?शहरात घरफाेडीपाठाेपाठ सायकल चाेरीचे प्रमाण वाढले आहे.  रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात. श्वानांच्या आवाजाने नागरिक सतर्क हाेतात. त्यामुळे चाेरट्यांपैकीच काेणी या श्वानांना खाण्यातून विष दिले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :dogकुत्राRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसDeathमृत्यू