शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

विकृतीचा कळस! रत्नागिरीत २१ श्वानांना विष घालून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:17 IST

21 dogs were poisoned :  रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात.

ठळक मुद्देयाबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी परिसरातील सुमारे २१ श्वानांना खाण्यातून विष देऊन मारल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला़ हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील डाेंगरे गुरुवारी सकाळी आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी येथून जात असताना एका ठिकाणी श्वान मृतावस्थेत दिसले़ थाेडे पुढे गेल्यानंतर आणखी काही श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांनी पाहिले़ ते तसेच पुढे गेले असता आराेग्य मंदिर ते पटवर्धनवाडी या परिसरात तब्बल २१ श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसले़ या रस्त्यावर ठिकठिकाणी श्वानांना खाण्यासाठी चिकन व भात ठेवल्याचे त्यांनी पाहिले़ त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली़.

त्यांनी दिलेल्या या फिर्यादीत कुणीतरी अज्ञाताने श्वानांना जीव मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये काेणते तरी विषारी औषध टाकून ते श्वानांना खायला दिले़ त्यामुळेच या श्वानांचा मृत्यू झाल्याचे डाेंगरे यांनी म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पाेलिसांनी अज्ञातावर प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम १९६०चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करत आहेत.

निर्बिजीकरण माेहीम बंदरत्नागिरी शहरात श्वानांचे प्रमाण वाढल्याने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीनंतर रत्नागिरी नगर परिषदेने श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची माेहीम हाती घेतली हाेती़. या माेहिमेवर आतापर्यंत ४६ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दाेन वर्षापासून काेराेनामुळे ही माेहीम बंद आहे़ त्यामुळे श्वानांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हत्या मागचे कारण काय?शहरात घरफाेडीपाठाेपाठ सायकल चाेरीचे प्रमाण वाढले आहे.  रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात. श्वानांच्या आवाजाने नागरिक सतर्क हाेतात. त्यामुळे चाेरट्यांपैकीच काेणी या श्वानांना खाण्यातून विष दिले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :dogकुत्राRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसDeathमृत्यू