शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विकृतीचा कळस! रत्नागिरीत २१ श्वानांना विष घालून संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 20:17 IST

21 dogs were poisoned :  रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात.

ठळक मुद्देयाबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

रत्नागिरी : शहरातील आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी परिसरातील सुमारे २१ श्वानांना खाण्यातून विष देऊन मारल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला़ हा सर्व प्रकार गुरुवारी सकाळी ६ वाजता उघडकीस येताच शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे. याबाबत प्राणीमित्र सुनील उदय डोंगरे (२३, रा. गाेडावून स्टाॅप, नाचणे, रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील डाेंगरे गुरुवारी सकाळी आरोग्य मंदिर ते पटवर्धनवाडी येथून जात असताना एका ठिकाणी श्वान मृतावस्थेत दिसले़ थाेडे पुढे गेल्यानंतर आणखी काही श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांनी पाहिले़ ते तसेच पुढे गेले असता आराेग्य मंदिर ते पटवर्धनवाडी या परिसरात तब्बल २१ श्वान मृतावस्थेत असल्याचे त्यांना दिसले़ या रस्त्यावर ठिकठिकाणी श्वानांना खाण्यासाठी चिकन व भात ठेवल्याचे त्यांनी पाहिले़ त्यानंतर त्यांनी याबाबत शहर पाेलीस स्थानकात फिर्याद दिली़.

त्यांनी दिलेल्या या फिर्यादीत कुणीतरी अज्ञाताने श्वानांना जीव मारण्याच्या उद्देशाने चिकन व भातामध्ये काेणते तरी विषारी औषध टाकून ते श्वानांना खायला दिले़ त्यामुळेच या श्वानांचा मृत्यू झाल्याचे डाेंगरे यांनी म्हटले आहे. या फिर्यादीनुसार पाेलिसांनी अज्ञातावर प्राण्यांना क्रुरतेने वागविणे अधिनियम १९६०चे कलम ११ (जी) (टी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे़ याप्रकरणी अधिक तपास पोलीस हेडकाॅन्स्टेबल लक्ष्मण कोकरे करत आहेत.

निर्बिजीकरण माेहीम बंदरत्नागिरी शहरात श्वानांचे प्रमाण वाढल्याने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. या मागणीनंतर रत्नागिरी नगर परिषदेने श्वानांचे निर्बिजीकरण करण्याची माेहीम हाती घेतली हाेती़. या माेहिमेवर आतापर्यंत ४६ लाख इतका खर्च करण्यात आला आहे. मात्र, गेल्या दाेन वर्षापासून काेराेनामुळे ही माेहीम बंद आहे़ त्यामुळे श्वानांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. हत्या मागचे कारण काय?शहरात घरफाेडीपाठाेपाठ सायकल चाेरीचे प्रमाण वाढले आहे.  रात्रीच्यावेळी हे चाेरटे फिरत असताना श्वान त्यांच्या मागे लागतात. श्वानांच्या आवाजाने नागरिक सतर्क हाेतात. त्यामुळे चाेरट्यांपैकीच काेणी या श्वानांना खाण्यातून विष दिले असावे, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. 

टॅग्स :dogकुत्राRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसDeathमृत्यू