शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

हृदयद्रावक! पत्नीचा माहेरी जाण्याचा हट्ट मुलाच्या जीवावर बेतला; पित्याने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 15:30 IST

Crime News : जन्मदात्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. रागाच्या भरात त्याने आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - बिहारच्या (Bihar) बेगूसरायमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पत्नीचा माहेरी जाण्याचा हट्ट मुलाच्या जीवावर बेतला आहे. जन्मदात्या पित्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. रागाच्या भरात त्याने आपल्या 13 महिन्यांच्या मुलाला नदीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. चिमुकल्याचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. भगवानपूर पोलीस स्टेशन हद्दीतील बनवारीपूर गावात ही संतापजनक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनीष कुमार नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलाला नदीत फेकून दिलं. त्यानंतर मुलाचा बुडून मृत्यू झाला. 

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. पोस्टमॉर्टमनंतर मुलाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. बनवारी पूर गावातील रहिवासी मनीष चौरसिया याचा पत्नी कांचन देवीसोबत तिच्या माहेरी जाण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने रागात आपला 13 महिन्यांचा मुलगा शिवम कुमार याला घराजवळ असलेल्या बलान नदीमध्ये फेकून दिलं. त्यात पाण्यात बुडून शिवमचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी वडील मनीष चौरसियाला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुलाची आई कांचन देवीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी संध्याकाळी ती तिच्या माहेरी जाण्याच्या तयारीत होती. यानंतर दारूच्या नशेत तेथे पोहोचलेल्या पतीने तिला जाण्यास नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. यानंतर तिचा पती रागावला आणि मुलासह निघून गेला. काही वेळाने तिने पतीला मुलाबद्दल विचारले असता, तो बोटीवर फिरत असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर बोटीवर शोध घेऊनही शिवम कुठेच सापडला नाही, तेव्हा संशय आला. 

आजूबाजूच्या लोकांसह मुलाचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. लोकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला अटक केली. त्यानंतर कठोर चौकशी केली असता त्याने मुलाला नदीत फेकून दिल्याचं सांगितले. आरोपी आणि कांचन देवी यांचा विवाह सात वर्षांपूर्वी झाल्याचं सांगण्यात येत आहे. ज्याच्यापासून त्यांना तीन मुले आहेत. पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस