शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! तरुणीने कुटुंबातील १३ जणांची विष देऊन केली हत्या; कारण ऐकून धक्काच बसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 13:02 IST

Crime News : एका तरुणीने आपल्याच कुटुंबियांची विष देऊन हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Crime News : एका तरुणीने आपल्याच कुटुंबातील १३ जणांची विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे, ही घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतातील आहे. या प्रकरणी एका तरुणीला अटक केली आहे. अन्नामध्ये विषारी पदार्थ मिसळून आपल्या कुटुंबातील १३ जणांची हत्या केल्याचा तरुणीवर आरोप आहे.

मिळालेली माहिती अशी, या घटने प्रकरणी धक्कादायक खुलासा झाला आहे. मुलीचे कुटुंबीय तिच्या इच्छेनुसार लग्न करण्यास तयार नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी खैरपूर येथील देल हैबत खान ब्रोही गावाजवळ रोझीचा मृत्यू झाला. आई-वडील यांच्यासह कुटुंबातील सर्व सदस्यांना विष देण्याचा कट तिने रचल्याचे उघड झाले आहे.

४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, "जेवण खाल्ल्यानंतर सर्व १३ सदस्य आजारी पडले आणि त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सर्वांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन केले असता, विषारी अन्न प्राशन केल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी सखोल तपास केला असता, मुलगी आणि तिच्या प्रियकराने घरात रोटी बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गव्हात विष मिसळल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रविवारी पोलिसांनी तरुणीला अटक केली.

१९ ऑगस्ट रोजी घरी जेवल्यानंतर आजारी पडून कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी चार जणांचाही रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मृत्यूचे कारण काहीतरी गूढ आजार किंवा अन्न विषबाधा आहे. मात्र, खैरपूरचे एसएसपी समिउल्ला सोमरो यांच्या सूचनेवरून पोलिसांनी वेगवेगळ्या कोनातून तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. डीएसपी म्हणाले की, पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे पोस्टमॉर्टम अहवाल मिळवले आणि कोणत्या प्रकारच्या विषारी पदार्थामुळे इतके मृत्यू झाले हे शोधण्यासाठी त्यावर काम केले. तपासादरम्यान पीडितांनी खाल्लेल्या अन्नात विष मिसळल्याचे समोर आले.

मुलीनेच लग्नासाठी आपल्याच कुटुंबियांची हत्या केल्याचे समोर आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPakistanपाकिस्तान