शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

Crime News : अल्पवयीन मैत्रिणीचा विवाह रोखण्यासाठी गेलेल्या तीन मुलींना ग्रामस्थांनी पकडले, दिली अशी शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 23:40 IST

Crime News: झारखंडमधील पाकुड जिल्ह्यातील महेशपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये मैत्रिणीचा बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींना गावातील पंचायतीन शिक्षा सुनावली आहे. तिघींनाही प्रत्येकी १७ हजार रुपयांचा दंड पंचायतीने सुनावला आहे.

रांची - झारखंडमधील पाकुड जिल्ह्यातील महेशपूर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रामध्ये मैत्रिणीचा बालविवाह रोखण्यासाठी गेलेल्या तीन मैत्रिणींना गावातील पंचायतीन शिक्षा सुनावली आहे. तिघींनाही प्रत्येकी १७ हजार रुपयांचा दंड पंचायतीने सुनावला आहे. ही घटना लुतीबाडी गावातील आहे. गेल्या मंगळवारी येथे तीन मुली एका मुलीचा विवाह मोडण्यासाठी आल्या होत्या. त्या तिघीही तिच्यावर विवाह मोडण्यासाठी दबाव आणत होत्या. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थानिक आदिवासींनी या तिघींपैकी दोघींना पकडले. मात्र तिसरी मुलगी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाली. दरम्यान, पंचायतीने तिघींना प्रत्येकी १७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यानंतर तिघींची मुक्तता केली.

ग्रामस्थांनी सांगितले की, या तिघीजणी लग्न न करण्याचा दबाव आणण्यासाठी त्यांची मैत्रिण असलेल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यांच्यापैकी दोघींना ग्रामस्थांनी पकडले. तर एकीने तिथून पळून जाण्यात यश मिळवले. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधिकारी गावात पोहोचले. त्यांनी दोन्ही मुलींची सुटका करण्याचे आदेश ग्रामस्थांना दिले. तेव्हा या मुलींना ओलीस ठेवलेले नाही तर केवळ पकडून ठेवण्यात आले आहे, असे सांगितले. आदिवासी रीती-रिवाजानुसार तिघींना दंड ठोठावण्यात येईल, नंतर सोडण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर दोन पोलिसांची तैनाती करून पोलीस अधिकारी गावातून माघारी आले.

दरम्यान, पकडलेल्या दोन्ही तरुणींना गावच्या सरपंचाच्या घरात ठेवण्यात आले. तसेच तिघींच्याही पालकांना बोलावण्यात आले. त्यानंतर तिन्ही तरुणी आणि त्यांच्या पालकांनी चूक मान्य केली. त्यानंतर तिघींनाही दंड ठोठावून सोडण्यात आले.

मिळत असलेल्या माहितीनुसार ज्या तरुणीचा विवाह होणार होता ती अल्पवयीन आहे. त्यामुळे तिन्ही मैत्रिणी तिच्या विवाहाला विरोध करत होत्या. तसेच लग्न न करण्यासाठी दबाव आणत होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नJharkhandझारखंड