शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Crime News: जन्मदात्या आईनेच पोटच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले, धक्कादायक कारण आले समोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 08:03 IST

Crime News: एका आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारल्याचे समोर आले आहे. या महिलेने स्वत:च्या तीन मुलांना मारल्यानंतर स्वत:ही टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे

चंडीगड - हरियाणामधील महेंद्रगड जिल्ह्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारल्याचे समोर आले आहे. या महिलेने स्वत:च्या तीन मुलांना मारल्यानंतर स्वत:ही टँकमध्ये उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

ही घटना नारनौल सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुबलाना गावातील आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार आईने तिच्या तीन मुलांना पाण्यात बुडवून मारले. तर त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. मिळालेल्य माहितीनुसार ही महिला मध्य प्रदेशमधील होती. या खळबळजनक घटनेबाबत पोलिसांकडून अद्यापपर्यंत फार माहिती देण्यात आलेली नाही. तसेच कुठलेही विधान करणे पोलीस टाळत आहेत.

मृत महिलेच्या दिराने सदर महिला आणि तिच्या पतीमध्ये मतभेद होते. मात्र आत्महत्येपर्यंत प्रकरण जावे एवढे मतभेद नव्हते, अशी माहिती दिली आहे. या घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी अॅडिशनल सुप्रिटेंडेंट ऑफ  पोलीस संदीप कुमार मलिक यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळले. दरम्यान, स्वत:च्या तीन मुलांची हत्या करताना एका आईच्या काळजाला पाझर कसा नाही फुटला, तसेच तिनेही कशी काय आत्महत्या केली, याबाबतची चर्चा गावात सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाFamilyपरिवार