शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Crime News: प्रियकराची वरात निघताच तिने लावला गळफास, १२ पानी पत्रात करुण कहाणी मांडून संपवलं जीवन  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 21:39 IST

Crime News: प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अनेक लोक मनातून तुटून जातात, त्यांना धक्का बसतो. प्रेमप्रकरणात धोका मिळाल्यानंतर समाज, पोलीस आणि न्यायालय अशा तिघांकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर अशी व्यक्ती करणार तरी काय? असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सिमला - प्रेमात फसवणूक झाल्यानंतर अनेक लोक मनातून तुटून जातात, त्यांना धक्का बसतो. प्रेमप्रकरणात धोका मिळाल्यानंतर समाज, पोलीस आणि न्यायालय अशा तिघांकडूनही अपेक्षाभंग झाल्यानंतर अशी व्यक्ती करणार तरी काय? असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका घटस्फोटित महिलेने तिच्या माजी प्रियकराची वरात निघाल्यावर गळफास लावून आत्महत्या केली. दरम्यान, या महिलेने १२ पानी सुसाई़ड नोट लिहून आपली करुण कहाणी मांडली आहे.

मृत महिला ही कोतवाली बाजार धर्मशाला येथील राहणारी होती. तसेच ती कांगडा येथे ब्युटी पार्लर चालवत होती. सदर महिला ३५ वर्षांची होती. तसेच तिचा २०१३ मध्ये घटस्फोट झाला होता. सदर महिला कांग्रा येथील छोटी हडेल पंचायतीच्या जोगीपूर येथे भाड्याच्या घरात राहत होती. यादरम्यान, तिची भेट एका तरुणासोबत झाली. तसेच दोघेही एकत्र राहू लागले. तसेच या युवकाने महिलेला लग्न करण्याचे आश्वासनही दिले.

मात्र हा तरुण या महिलेला फसवत होता, त्यामुळे या महिलेने तरुणाविरोधात अत्याचाराचा गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर सदर तरुणाला १७ एप्रिल २०२२ रोजी अटक करण्यात आली. सध्या तो जामिनावर बाहेर होता. यादरम्यान, त्याचा विवाह ठरला आणि त्याची वरात निघताच महिलेने आत्महत्या केली. आता पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

१२ पानांच्या सुसाईड नोटमधून सदर महिलेने आपली करुण कहणी मांडली आहे. त्यामध्ये तिने आपली मुलगी आणि आई वडिलांची माफी मागितली आहे. तसेच या महिलेने सांगितले की, कांग्रा पोलिसांनी तिने केलेल्या आरोपांकडे फारसे गांभीर्याने पाहिले नाही. २९ मार्चला ती पहिल्यांदा कांग्रा पोलीस ठाण्यात गेली. तिथून तिला धर्मशाला येथील वुमन सेलकडे पाठवण्यात आले. एसएचओने तिचे म्हणणे ऐकून घेतले नाही. तसेच ती विवाहित असून, विवाहाच्या आमिषामध्ये फसल्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. सदर महिला आणि तरुण हे लिव्ह इनमध्ये राहत आहेत. त्यामुळे असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. खूप प्रयत्नांनंतर गुन्हा दाखल झाला. मात्र अटकेनंतर सदर तरुणाला २२ दिवसांतच जामीन मिळाला, असे या सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नHimachal Pradeshहिमाचल प्रदेश