शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अजबच! 15 दिवसांत दुसऱ्यांदा बोहल्यावर चढला काँग्रेसचा नेता; पोलिसांनी मंडपातून घेतलं ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 19:37 IST

Crime News : नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात गुरुवारी एक अजब घटना घडली. मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेत मिळणाऱ्या लाभाच्या हव्यासापोटी एनएसयूआयच्या राष्ट्रीय समन्वयकाने चक्क दुसऱ्यांदा विवाह केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे त्याचा पहिला विवाह  हा 15 दिवसांपूर्वीच झाला होता आणि तेही लव्ह मॅरेज. नैतिक चौधरी असं या नेत्याचं नाव असून पोलिसांनी त्याला दुसऱ्यांदा लग्न करताना पकडलं आहे. तसेच आता ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. याच दरम्यान भाजपाने काँग्रेसला टोला लगावला आहे. यासोबतच यावरून निशाणा साधला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सागरमधील बालाजी मंदिर परिसरात सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात 135 जोडप्यांनी विवाह केला. एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक नैतिक चौधरी यांना मुख्यमंत्री कन्या विवाह योजनेच्या अंतर्गत मिळणारा लाभ हवा होता. त्यामुळे नैतिक चौधरी पत्नीला घेऊन दुसऱ्यांदा लग्न करण्यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याला पोहोचले. नैतिक चौधरींना मंडपात पाहून कोणीतरी याची माहिती आयोजकांना दिली. त्यानंतर आयोजकांनी याची सूचना पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीनं सोहळ्यास्थळी येऊन नैतिक चौधरींना ताब्यात घेतलं.

नैतिक चौधरींना पोलीस ठाण्यात नेलं. नैतिक चौधरींचा विवाह दोनच आठवड्यापूर्वी धूमधडाक्यात संपन्न झाला होता. पोलीस नैतिक यांना पोलीस ठाण्यात नेत असताना पत्नीदेखील त्यांच्यामागे धावली. दुसऱ्यांदा विवाह करायला नको, असं पत्नीनं नैतिक यांना सांगितलं होतं. पोलीस आता नैतिक चौधरींची चौकशी करत आहेत.

मध्य प्रदेश भाजपाचे माध्यम प्रभारी लोकेंद्र पराशर यांनी या प्रकरणावरून ट्विट करत जोरदार निशाणा साधला. "हे श्रीमान एनएसयूआयचे राष्ट्रीय समन्वयक आहेत. मुख्यमंत्री कन्यादान योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसऱ्यांदा विवाह करण्यास जात होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. काय म्हणता कमलनाथजी!" असा टोला पराशर यांनी लगावला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसmarriageलग्न