शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

बाबो! पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं; फेसबुकवर तिसऱ्यावरच प्रेम जडलं अन् भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 18:36 IST

Crime News : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यात आली होती. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या तरुणासोबत लग्न करते. मात्र यानंतरही ती फेसबुकवर तिसऱ्याच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे फेसबुकवरच्या तिच्या प्रेमाने अखेर तिचाच घात केला. त्याने तिला विष दिलं आणि ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिची गळा दाबून तिची हत्या केली आहे. सतना पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यात आली होती. 

प्रियकराने आपल्या मित्रांसह मिळून तिला आधी विष दिलं आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर तिला जवळील जंगलात फेकून दिलं. 27 डिसेंबर रोजी मिळालेल्या या मृतदेहानंतर तपास सुरू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नंदू उर्फ नंदकिशोर यादव आणि अर्जुन पटेल याला अटक केली आहे. दोघेही उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांच्याकडे निळ्या रंगाची एक्टिवा स्कूटी आणि मृत महिलेचा मोबाईल सापडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅगेतून छत्तीसगडचा पत्ता सापडला. 

फेसबुकवरच्या प्रेमाने केला 'तिचा' घात

30 डिसेंबर रोजी मोबाईल नंबरवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. महिलेचा दीर असल्याचं सांगण्यात आलं. ही महिला 22 डिसेंबरपासून स्कूटी घेऊन बेपत्ता आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या मोबाईलमधून कॉल डिटेल्स बाहेर काढले आणि आरोपीसोबत जवळीक असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी नंदू आणि अर्जुन यांना ताब्यात घेतलं आहे. कसून चौकशी केल्यावर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आणि महिला लग्न, एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचं सांगितलं. यामुळे दोघांनी आधी महिलेला विष दिलं, त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी नंदू महिलेची स्कूटी आणि मोबाईल घेऊन फरार झाला.

'असा' झाला लव्हस्टोरीचा भयानक अंत

आरोपी नंदूने महिलेला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी मित्र अर्जून याच्यासोबत मिळून 24 डिसेंबर रोजी हत्या केली. नंदूने आधी महिलेच्या जेवणात विष दिलं, मात्र विषामुळे तिचा मृत्यू झाला नसल्यानं त्याने महिलेचा गळा आवळला. विवाहित असतानाही प्रियकरासोबत लग्न आणि एकत्र राहण्याच्या हट्टापायी हत्या केल्याचं आरोपीने सांगितले. महिलेचं पहिलं लग्न संजय शाहसोबत झालं होतं. यादरम्यान बांदा येथील नंदूसोबत ऑनलाईन भेट झाली. फेसबुकवर दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं. ते एकमेकांसोबत मोबाईलवर बोलत होते. फेसबुकवर दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. यानंतर नंदू अनेकदा तिला भेटायला छत्तीसगड देखील गेला होता. नंदूदेखील विवाहित आहे. महिलेने हट्ट केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी