शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

बाबो! पहिल्या पतीला सोडून दुसरं लग्न केलं; फेसबुकवर तिसऱ्यावरच प्रेम जडलं अन् भलतंच घडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 18:36 IST

Crime News : फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यात आली होती. 

नवी दिल्ली - मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक महिला पहिल्या पतीला सोडून दुसऱ्या तरुणासोबत लग्न करते. मात्र यानंतरही ती फेसबुकवर तिसऱ्याच एका तरुणाच्या प्रेमात पडल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे फेसबुकवरच्या तिच्या प्रेमाने अखेर तिचाच घात केला. त्याने तिला विष दिलं आणि ती बेशुद्ध अवस्थेत असताना तिची गळा दाबून तिची हत्या केली आहे. सतना पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा केला आहे. फेसबुकच्या माध्यमातून झालेल्या प्रेमाचा भयावह अंत झाला. ही महिला आपल्या प्रियकरासाठी छत्तीसगडहून स्कूटीवरुन मध्य प्रदेशातील सतला जिल्ह्यात आली होती. 

प्रियकराने आपल्या मित्रांसह मिळून तिला आधी विष दिलं आणि त्यानंतर गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर तिला जवळील जंगलात फेकून दिलं. 27 डिसेंबर रोजी मिळालेल्या या मृतदेहानंतर तपास सुरू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी नंदू उर्फ नंदकिशोर यादव आणि अर्जुन पटेल याला अटक केली आहे. दोघेही उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील राहणारे आहेत. त्यांच्याकडे निळ्या रंगाची एक्टिवा स्कूटी आणि मृत महिलेचा मोबाईल सापडला आहे. घटनास्थळी मिळालेल्या बॅगेतून छत्तीसगडचा पत्ता सापडला. 

फेसबुकवरच्या प्रेमाने केला 'तिचा' घात

30 डिसेंबर रोजी मोबाईल नंबरवर एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. महिलेचा दीर असल्याचं सांगण्यात आलं. ही महिला 22 डिसेंबरपासून स्कूटी घेऊन बेपत्ता आहे. पोलिसांनी मृत महिलेच्या मोबाईलमधून कॉल डिटेल्स बाहेर काढले आणि आरोपीसोबत जवळीक असल्याचं समोर आलं. या प्रकरणात पोलिसांनी नंदू आणि अर्जुन यांना ताब्यात घेतलं आहे. कसून चौकशी केल्यावर दोघांनी आपला गुन्हा कबूल केला आणि महिला लग्न, एकत्र राहण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचं सांगितलं. यामुळे दोघांनी आधी महिलेला विष दिलं, त्यानंतर तिचा गळा आवळून हत्या केली. यानंतर आरोपी नंदू महिलेची स्कूटी आणि मोबाईल घेऊन फरार झाला.

'असा' झाला लव्हस्टोरीचा भयानक अंत

आरोपी नंदूने महिलेला आपल्या रस्त्यातून हटवण्यासाठी मित्र अर्जून याच्यासोबत मिळून 24 डिसेंबर रोजी हत्या केली. नंदूने आधी महिलेच्या जेवणात विष दिलं, मात्र विषामुळे तिचा मृत्यू झाला नसल्यानं त्याने महिलेचा गळा आवळला. विवाहित असतानाही प्रियकरासोबत लग्न आणि एकत्र राहण्याच्या हट्टापायी हत्या केल्याचं आरोपीने सांगितले. महिलेचं पहिलं लग्न संजय शाहसोबत झालं होतं. यादरम्यान बांदा येथील नंदूसोबत ऑनलाईन भेट झाली. फेसबुकवर दोघांचंही प्रेम प्रकरण सुरू झालं. ते एकमेकांसोबत मोबाईलवर बोलत होते. फेसबुकवर दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं होतं. यानंतर नंदू अनेकदा तिला भेटायला छत्तीसगड देखील गेला होता. नंदूदेखील विवाहित आहे. महिलेने हट्ट केल्यानंतर त्याने तिची हत्या केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :FacebookफेसबुकCrime Newsगुन्हेगारी