शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
4
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
5
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
11
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
12
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
13
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
14
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
15
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
16
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
17
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
18
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
19
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
20
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले

भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 12:44 IST

Crime News : गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कानपूरमध्ये ही अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. फजलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे. परिसरात प्रेम किशोर परचून यांचा दुकान आहे. त्या दुकानामागेच त्यांचं घर देखील आहे. रात्री प्रेम किशोर, त्यांची पत्नी गीता, मुलगा नैतिक जेवण करून झोपी गेले होते. मात्र सकाळ झाली तरी दुकान उघडलं नसल्याने परिसरातील लोक त्यांच्या घरी गेले. 

लोकांनी खूप वेळ दरवाजा ठोकला पण कोणीच बाहेर आले नाही. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड टीम, सर्व्हिलान्स टीम याचा अधिक तपास करत आहे. तसेच पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला जात. आहे. पोलीस अधिकारी संजीव त्यागी यांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा

पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पती, पत्नी आणि मुलगा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहायला मिळालं. मृतांच्या नातेवाईकांनी प्रेम यांचं कोणाशीच भांडण अथवा वैर नसल्याचं म्हटलं आहे. संजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या ही गळ्या दाबून करण्यात आली आहे. तर पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा आहेत. पोलीस याचा वेगाने तपास करत असून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू