शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
6
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
7
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
8
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
9
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
10
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
11
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
12
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
13
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
14
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
15
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
16
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
17
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
18
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
19
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
20
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 

भयंकर! 12 तासांत 5 खून, एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मन सुन्न करणारी घटना, परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 12:44 IST

Crime News : गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. कानपूरमध्ये ही अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. फजलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुटुंबातील तीन लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. गेल्या 12 तासांत कानपूरमध्ये पाचवा खून करण्यात आला आहे. यामुळे परिसरात खळबळ निर्माण झाली असून दहशत पसरली आहे. परिसरात प्रेम किशोर परचून यांचा दुकान आहे. त्या दुकानामागेच त्यांचं घर देखील आहे. रात्री प्रेम किशोर, त्यांची पत्नी गीता, मुलगा नैतिक जेवण करून झोपी गेले होते. मात्र सकाळ झाली तरी दुकान उघडलं नसल्याने परिसरातील लोक त्यांच्या घरी गेले. 

लोकांनी खूप वेळ दरवाजा ठोकला पण कोणीच बाहेर आले नाही. यानंतर याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी घरामध्ये तिघांचे मृतदेह आढळून आले. मृतदेह पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. सध्या पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. फॉरेन्सिक टीम, डॉग स्कॉड टीम, सर्व्हिलान्स टीम याचा अधिक तपास करत आहे. तसेच पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला जात. आहे. पोलीस अधिकारी संजीव त्यागी यांनी अधिक तपास सुरू असल्याचं म्हटलं आहे. 

पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा

पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा पती, पत्नी आणि मुलगा हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं पाहायला मिळालं. मृतांच्या नातेवाईकांनी प्रेम यांचं कोणाशीच भांडण अथवा वैर नसल्याचं म्हटलं आहे. संजीव त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाची हत्या ही गळ्या दाबून करण्यात आली आहे. तर पती-पत्नीच्या शरीरावर जखमांच्या असंख्या खुणा आहेत. पोलीस याचा वेगाने तपास करत असून दोषींना कठोरातील कठोर शिक्षा केली जाईल असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू