शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

Crime News: पती, पत्नी आणि तीन मुली, एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या, भयावह हत्याकांडामुळे खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2022 11:29 IST

Crime News: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावात काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले.

प्रयागराज - उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. येथील नवाबगंज पोलीस ठाणे क्षेत्रातील खागलपूर गावात काल रात्री हे निर्घृण हत्याकांड घडले. येथे राहुल तिवारी, त्यांची पत्नी प्रिती आणि तीन मुलींची हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडांचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार कौशांबी येथील हे कुटुंब नवाबगंज येथील खागलपूर गावात भाड्याच्या घरात राहत होते. हत्येची माहिती मिळाल्यावर नवाबगंज ठाणे पोलीस तत्काळ घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवले. फॉरेन्सिक एक्स्पर्ट्स आणि डॉग स्क्वॉडला घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना काल रात्रीची आहे. सकाळी घराचा दरवाजा बंद होता. बराच वेळ घरातून काही हालचार दिसत नसल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी दरवाजा ठोठावून पाहिला. मात्र दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता राहुल यांचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत सापडला. तर राहुल यांची पत्नी आणि तीन मुलींचे मृतदेह बेडवर पडले होते. त्यांचा गळा कापून हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन शोक जाहीर केला आहे. तसेच अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून निष्पक्षपणे तपास करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशFamilyपरिवार