शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' पत्नीलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 12:43 IST

Crime News : लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसांनी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आझाद खान असं 21 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून त्याने पत्न किर्तीची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे किर्तीसोबत प्रेमसंबंध होते. कामाच्या निमित्ताने त्यांची आधी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या या लग्नाला कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांपूर्वीच कोर्टात जाऊन लग्न केलं होतं आणि आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली होती. पण लग्नानंतर नातं बदललं. 

घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा यायचा आवाज

मोहम्मद आणि किर्तीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा आवाज येत असल्याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मंडळींनी दिली आहे. हत्या झाली त्यादिवशी देखील त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि किर्ती जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरी आले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि मोहम्मद घरातून गायब झाला होता. शेजाऱ्यांनी कीर्तीच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.

आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झालें. त्यावेळी किर्तीच्या शरीरावर वार केलेले दिसून आलं.मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी देखील या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. लग्नानंतर आवघ्या आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस