शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

भयंकर! सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटलं; प्रेमविवाहानंतर 'त्याने' पत्नीलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 12:43 IST

Crime News : लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. प्रेमविवाहानंतर अवघ्या आठ दिवसांनी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात जन्माचं नातं अवघ्या 8 दिवसांत तुटल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने या दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केलं होतं. मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत वाद होत असल्यानेच पतीने टोकाचं पाऊल उचललं आणि तिची हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर पती फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद आझाद खान असं 21 वर्षीय आरोपी पतीचं नाव असून त्याने पत्न किर्तीची हत्या केली. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे किर्तीसोबत प्रेमसंबंध होते. कामाच्या निमित्ताने त्यांची आधी ओळख झाली होती. त्यानंतर पुढे त्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असल्यामुळे त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्या या लग्नाला कुटुंबीयांनी जोरदार विरोध केला. त्यानंतर त्यांनी आठ दिवसांपूर्वीच कोर्टात जाऊन लग्न केलं होतं आणि आपल्या नव्या संसाराला सुरुवात केली होती. पण लग्नानंतर नातं बदललं. 

घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा यायचा आवाज

मोहम्मद आणि किर्तीमध्ये अनेक गोष्टींवरून वाद होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या घरातून नेहमीच जोरजोरात भांडण्याचा आवाज येत असल्याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मंडळींनी दिली आहे. हत्या झाली त्यादिवशी देखील त्यांच्यात मोठं भांडण झालं आणि किर्ती जोरात किंचाळली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी घरी आले तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि मोहम्मद घरातून गायब झाला होता. शेजाऱ्यांनी कीर्तीच्या भावाला फोन करून घटनेची माहिती दिली.

आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का

पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झालें. त्यावेळी किर्तीच्या शरीरावर वार केलेले दिसून आलं.मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेजाऱ्यांनी देखील या दोघांमध्ये सतत वाद होत असल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. लग्नानंतर आवघ्या आठ दिवसांतच किर्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस