शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
3
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
4
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
5
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
6
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
7
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
8
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
9
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
10
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
11
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
12
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
13
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
14
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
15
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
16
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
17
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
18
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
19
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
20
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा

धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:07 IST

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीला दारु कमी पडल्यामुळे मित्रालाच चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले आहे.

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळच्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येच कारणही किरकोळ आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बर्थडे पार्टीत दारू न मिळाल्याने तीन तरुणांनी आपल्याच मित्राला इमारतीवरून फेकून दिल्याचे वृत्त आहे. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू आहे.

नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जून रोजी चिंचपाडा येथे घडली. मृत कार्तिक वायाळ याने नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव या तीन मित्रांना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. ते तिघेही रात्री उशीरपर्यंत दारु पित बसले होते. दारूसोबत संभाषण सुरूच होते आणि रात्री उशिरा दारू संपली तेव्हा दारूच्या कमतरतेवरून चार मद्यधुंद मित्रांमध्ये भांडण सुरू झाले.

यावेळी कार्तिक याला अपमानास्पद वाटल्याने त्याने दारूची बाटली उचलून नीलेशच्या डोक्यात मारली. या मारहाणीचा डोक्यात राग धरुन निलेश याने अन्य दोघांसह कट रचला. त्या तिघांनीही कार्तिक राहत असलेल्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी त्याला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. यामुळे कार्तिक गंभीर जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल केला परंतु त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली . भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश देवल नगरच्या क्रांती नगर रेश्मा इद्रिस बानो यांचा १५ वर्षांचा मुलगा सैफ हा अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसला होता . त्यावेळी आईने त्याला मोबाईल वर गेम न खेळता अभ्यास कर असे सांगितले .  त्याचा सैफ ह्याला राग आला आणि त्याने २९ जूनच्या सायंकाळी घरातच गळफास घेतला . त्याला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .

या प्रकरणी आई रेश्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पोलिसांनी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस