शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
3
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
4
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
5
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
6
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
7
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
8
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशकवाद्यांना कंठस्नान 
9
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
10
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
11
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
12
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
13
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
14
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
16
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
17
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
18
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते
19
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
20
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका

धक्कादायक! बर्थडे पार्टीला दारु कमी पडली, तीन तरुणांनी मित्राला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 09:07 IST

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्थडे पार्टीला दारु कमी पडल्यामुळे मित्रालाच चौथ्या मजल्यावरुन खाली फेकले आहे.

Crime News: कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जवळच्या मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. हत्येच कारणही किरकोळ आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बर्थडे पार्टीत दारू न मिळाल्याने तीन तरुणांनी आपल्याच मित्राला इमारतीवरून फेकून दिल्याचे वृत्त आहे. सध्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले असून खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर कारवाई सुरू आहे.

नौदल अधिकारी गुंतले मानवी तस्करीत; गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २७ जून रोजी चिंचपाडा येथे घडली. मृत कार्तिक वायाळ याने नीलेश क्षीरसागर, सागर काळे आणि धीरज यादव या तीन मित्रांना वाढदिवस साजरा करण्यासाठी बोलावले होते. ते तिघेही रात्री उशीरपर्यंत दारु पित बसले होते. दारूसोबत संभाषण सुरूच होते आणि रात्री उशिरा दारू संपली तेव्हा दारूच्या कमतरतेवरून चार मद्यधुंद मित्रांमध्ये भांडण सुरू झाले.

यावेळी कार्तिक याला अपमानास्पद वाटल्याने त्याने दारूची बाटली उचलून नीलेशच्या डोक्यात मारली. या मारहाणीचा डोक्यात राग धरुन निलेश याने अन्य दोघांसह कट रचला. त्या तिघांनीही कार्तिक राहत असलेल्या घरी जाऊन त्याला मारहाण केली. यानंतर त्यांनी त्याला चौथ्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. यामुळे कार्तिक गंभीर जखमी झाला, त्याला रुग्णालयात दाखल केला परंतु त्याचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी पोलिसांनी चौकशी करुन तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

आईने मोबाईलमध्ये गेम खेळू नको सांगितल्याने १५ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

मोबाईल मध्ये अभ्यास करण्या ऐवजी मुलगा गेम खेळत असल्याचे पाहून आई ने अभ्यास कर म्हटले म्हणून १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली . भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीतील गणेश देवल नगरच्या क्रांती नगर रेश्मा इद्रिस बानो यांचा १५ वर्षांचा मुलगा सैफ हा अभ्यास करण्या ऐवजी मोबाईल वर गेम खेळत बसला होता . त्यावेळी आईने त्याला मोबाईल वर गेम न खेळता अभ्यास कर असे सांगितले .  त्याचा सैफ ह्याला राग आला आणि त्याने २९ जूनच्या सायंकाळी घरातच गळफास घेतला . त्याला भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले .

या प्रकरणी आई रेश्मा यांनी पोलिसांना दिलेल्या माहिती नुसार भाईंदर पोलिसांनी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे . वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत आहेत. ह्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस