शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Crime News: ४ वर्षापासून फरार असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक, पोलिसांनी अशा आवळल्या मुसक्या   

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2022 20:57 IST

Crime News: दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एकाची हत्या करून गेली ४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.

मीरारोड - दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून एकाची हत्या करून गेली ४ वर्ष फरार असलेल्या आरोपीला मीरा भाईंदर - वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने उत्तर प्रदेश येथून अटक केली आहे.

८ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या रात्री ८ च्या  सुमारास चालक रामलाल पटेल (३७) हे त्यांची गाडी पार्किंग मध्ये उभी करून घरी जात होते.  घरी जात असताना नालासोपारा च्या संतोष भुवन, गौराई पाडा नाका येथील अजय जयस्वाल यांचे भंगार दुकानालगत असलेल्या गल्लीत  सचिन सुनील उपाध्याय याने दारु पिण्यास पैसे दिले नाही म्हणून मनात राग धरुन पटेल यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने फटका मारला.  डोक्यास गंभीर दुखापत होवून मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने जे. जे. रुग्णालयात उपचार सुरु असताना पटेल यांचा मृत्यू झाला होता.

मयताची पत्नी उर्वशा पटेल यांच्या फिर्यादी नंतर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आरोपी  सचिन उपाध्याय हा मागील ४  वर्षापासून फरार होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे निरीक्षक अविराज कुराडे, सपोनि पुष्पराज सुर्वे सह संदिप शिंदे, किशोर वाडीले, पुषेंद्र थापा, अविनाश गर्जे,  विकास राजपुत, सुमीत जाधव यांनी सदर गुन्हयाचा समांतर तपास चालू केला होता.

बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन उपाध्याय यास पकडण्यासाठी पोलीस पथक उत्तर प्रदेश च्या वाराणसी येथे गेले होते. वाराणसी येथे स्थानिक एस. टी. एफ. यांची मदत घेवून सलग सात दिवस शोधमोहीम राबवत उपाध्याय रा. स्वारीपुर, पो. प्रमकापुर, मछली शहर , जौनपुर ह्याला शुक्रवारी पकडण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकMira Bhayanderमीरा-भाईंदर