शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दांपत्यानं साडेतीन लाखांना नवजात बालकाला विकलं; पोलिसांकडून ६ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 15:42 IST

Couple sells newborn for Rs 3.6 lakh : "ठरल्याप्रमाणे, बालकाच्या आई-वडिलांना दोन लाख रुपये रोख दिले गेले. दोन्ही जोडप्यांमध्ये करार झाला आणि गोविंद आणि पूजा यांना प्रत्येकी 60,000 रुपयांचे चार धनादेश देण्यात आले.

ठळक मुद्देगोविंद कुमार (३०) आणि त्यांची पत्नी पूजा देवी (२२) यांनी त्यांच्या नातेवाईक हरिपालसिंग (५०) यांच्यावर १५ जून रोजी सकाळी अपहरण केल्याचा आरोप केला.

दिल्लीपोलिसांनी गुरुवारी एका नवजात बालकाची विक्री केली आणि नंतर पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी सहा जणांना अटक केली. सहा आरोपींमध्ये सहा दिवसांच्या मुलाच्या पालकांचा समावेश आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, दोन पुरुषांना मुलाच्या खरेदीसाठी दुसर्‍या जोडप्याशी कथितपणे मध्यस्थी केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. मंगळवारी संध्याकाळी त्यांना एका जोडप्याचा फोन आला, अशी माहिती पोलिसांनी दिली असून, त्यांच्या मुलाला त्यांच्या नातेवाईकांनी अपहरण केल्याचा आरोप केला आहे. गोविंद कुमार (३०) आणि त्यांची पत्नी पूजा देवी (२२) यांनी त्यांच्या नातेवाईक हरिपालसिंग (५०) यांच्यावर १५ जून रोजी सकाळी अपहरण केल्याचा आरोप केला.

ही माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी त्यांच्या अपहरण प्रकरणाबद्दल उत्तर प्रदेशातील त्यांच्या पथकास सतर्क केले आणि कानपूर रेल्वे स्थानकात अपहरण झालेल्या मुलाला घेऊन जात असल्याचा आरोप असलेल्या आणखी एका जोडप्याचा शोध घेण्यास सांगितले. आणखी एक जोडपे - विद्यानंद यादव (५०) आणि त्यांची पत्नी रामप्रीदेवी (४५) यांना बाळासह पकडले आणि चौकशीसाठी स्थानिक पोलिस ठाण्यात नेले. त्यानंतर विद्यानंद यादव आणि रामपरी देवी यांनी गोविंद कुमार आणि पूजा देवींकडून मुलाला लाखो रुपयांच्या बदल्यात विकत घेतल्याचे उघडकीस आले."आम्हाला उत्तर प्रदेश पोलिसांकडून माहिती मिळताच आमचे पथक त्वरित कानपूरला गेले. परंतु, जेव्हा आम्ही त्या जोडप्यास भेटलो तेव्हा त्यांनी त्याचे अपहरण झाले नसल्याचे सांगितले. त्यांनी पैसे दिल्यानंतर बालकाला विकत घेतल्याचे सांगितले. पोलीस आश्चर्यचकित झाले. पोलीस पुढे म्हणाले की, या कराराचे पत्र होते. आम्ही हे अपहरण प्रकरण मानतो, असे पोलिस उपायुक्त (दक्षिण) अतुल ठाकूर यांनी सांगितले.

गोविंद आणि त्यांची पत्नी पूजा यांच्या जबाबामध्येही पोलिसांना अनेक विसंगती आढळून आल्या.अतिरिक्त पोलिस उपायुक्त हर्ष वर्धन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, "मुलाला विकल्यानंतर आईची अंतःकरण देखील बदललं. या जोडप्याने आम्हाला अया नगरमधील हरिपालच्या घराबद्दल सांगितले. पण त्यांना घरचा नेमका नंबर माहित नव्हता. हरिपालला पकडले असता त्याने सांगितले की, या जोडप्याने मुलाला ३. ६ लाख रुपयांना विकले आहे. "अतिरिक्त डीसीपीने सांगितले की, "हरिपालला आपल्या नातेवाईक विद्यानंद आणि रामपरी यांना रमण यादव मुलं विकणार हे माहित होतं. विद्यानंद आणि रामपरी यांच्या लग्नाला २५ हून अधिक वर्ष झाली होती, पण त्यांना मूलबाळ नव्हते.""ठरल्याप्रमाणे, बालकाच्या आई-वडिलांना दोन लाख रुपये रोख दिले गेले. दोन्ही जोडप्यांमध्ये करार झाला आणि गोविंद आणि पूजा यांना प्रत्येकी 60,000 रुपयांचे चार धनादेश देण्यात आले. कदाचित त्यांचे मन बदलले असेल आणि त्यानंतर त्यांनी तीन दिवसानंतर बनावट तक्रारीसह पोलिसात धाव घेतली  " अतिरिक्त डीसीपी पुढे म्हणाले.तपासादरम्यान पोलिसांना असे आढळले की, मुलाचा जन्म ८ जून रोजी गुरुग्राम रुग्णालयात झाला होता. त्यानंतर मुलाला आणि त्याच्या आईला १० जूनला सोडण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी आरोपी नवी दिल्लीच्या अया नगर येथील हरिपालच्या घरी भेटले होते.

टॅग्स :Arrestअटकdelhiदिल्लीPoliceपोलिस