शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

Coronavirus : 'हॉटस्पॉट' मुंबईत केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात, उद्धव ठाकरेंनी केली होती मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 13:35 IST

Coronavirus : मुंबई शहरामध्ये झोन १ ( कुलाबा ते मरीन ड्राईव्ह), झोन ३ ( ताडदेव, नागपाडा, वरळी ते एन. एम. जोशी मार्ग ), झोन ५ (धारावी ते दादर ) झोन ६ ( चेंबूर ते मानखुर्द ) आणि झोन ९ वांद्रे ते आंबोळी / अंधेरी पश्चिम )मध्ये या तुकड्या दाखल केल्या जाणार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

ठळक मुद्दे ३१ मेपर्यंत भारतात वाढवलेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा आणि अवघ्या ७ ते ८ दिवसांवर येऊन ठेपलेली रमजान ईद पाहता महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे सुरक्षा दलाची अधिकची कुमक देण्याबाबत मागणी केली होती. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लष्कर बोलवणार नसून राज्यातील पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्र सुरक्षा दलाच्या तुकड्या बोलवणार असल्याचे संकेत दिले होते. 

मुंबई -  कोरोना व्हायरसने गेली दोन महिने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. त्यात लॉकडाऊनमुळे आरोग्य यंत्रणेप्रमाणेच आता पोलीस यंत्रणा देखील थकली आहे. दरम्यान ३१ मेपर्यंत भारतात वाढवलेला लॉकडाऊनचा चौथा टप्पा आणि अवघ्या ७ ते ८ दिवसांवर येऊन ठेपलेली रमजान ईद पाहता महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे सुरक्षा दलाची अधिकची कुमक देण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये CISF आणि CRPF च्या तुकड्या दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. आज मुंबईमध्ये CISF आणि CRPF च्या ५ तुकड्या दाखल झाल्या आहेत. मुंबई शहरामध्ये झोन १ ( कुलाबा ते मरीन ड्राईव्ह), झोन ३ ( ताडदेव, नागपाडा, वरळी ते एन. एम. जोशी मार्ग ), झोन ५ (धारावी ते दादर ) झोन ६ ( चेंबूर ते मानखुर्द ) आणि झोन ९ वांद्रे ते आंबोळी / अंधेरी पश्चिम )मध्ये या तुकड्या दाखल केल्या जाणार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद ही शहरं सध्या रेड झोनमध्ये आहेत. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये सुमारे 1200 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर यापैकी मुंबईत 600 जणांचा समावेश आहे. तर 12 जणांनी जीव देखील गमावला आहे. अशातच सलग 2 महिने अविरत काम केल्याने पोलिस अधिकारी, कर्मचारी तणावाखाली आहेत. त्यांना काही काळ आराम देऊन पुन्हा कामावर रूजू करण्यासाठी आता केंद्राचे सुरक्षा दल महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करणार आहेत.पुणे शहरात काही दिवसांपूर्वीच रॅपिड अ‍ॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. त्यासोबतच नाशिक, अमरावती, औरंगाबाद मध्येही तुकड्या तैनात आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी राज्यात लष्कर बोलवणार असल्याचे वावडे उडले होते. त्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लष्कर बोलवणार नसून राज्यातील पोलिसांना आराम देण्यासाठी केंद्र सुरक्षा दलाच्या तुकड्या बोलवणार असल्याचे संकेत दिले होते. 

सीमेवर असलेले एटीएम डिटोनेटरने उडवले, रक्कम घेऊन आरोपी फरार

 

'माझा चेहरा शेवटचा पाहून घे', असं आईला प्रेमवेड्या युवकाने म्हणत झाडली स्वतःवर गोळी  

 

Coronavirus : लढवय्या २९१ पोलिसांनी केली कोरोनावर मात, आणखी लवकरच सुखरूप होऊन घरी परतणार

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या