शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

वडीलच मुलांच्या मृत्यूला जबाबदार : पत्नीची तक्रार, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:30 IST

घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडला होता़.

ठळक मुद्देपतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यु व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल

पुणे : पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्या घरात पत्नी व मुलांना झोपण्यास भाग पाडून मुलांच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी पत्नीने आपल्या पतीविरुद्ध सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे़. सिंहगड पोलिसांनी पतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यु व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी जान्हवी संदीप डोंगरे (वय ३०, रा़. शांतीवन आनंदनगर) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी पती संदीप सेवक डोंगरे, सासू जनाबाई सेवक डोंगरे, सासरे सेवक पंडित डोंगरे, दीर सतीश सेवक डोंगरे, जाऊ ज्योती सतीश डोंगरे (सर्व रा़. शांतीवन, आनंदनगर) आणि मावस सासू अनुसया खटाणे (रा़. बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडला होता़. त्यात सार्थक डोंगरे (वय ९) आणि साहिल डोंगरे (वय ११) यांचा मृत्यू झाला होता़. याबाबतची माहिती अशी, संदिप हे पत्नी व दोन मुलांसोबत आनंदनगर येथील सिद्धार्थ अपार्टमेंट येथे राहतात. ते  तुळजा भवानी इंटरप्रायझेस याठिकाणी पेस्ट कंट्रोलचे काम करतात. त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल करुन ते विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेले. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते परत आले. मात्र, पहाटे अचानक चौघांनाही उलट्यांचा व जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी संदिप यांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या घेतल्या. मात्र, सायंकाळी अचानक सार्थकला रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या. जान्हवी यांनाही त्रास होत होता. सार्थक याला ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाला़. दरम्यान, साहिल हाही बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़. जान्हवी आणि संदीप यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची दुसºया दिवशी सुटका करण्यात आली़. त्यानंतर साहिल याचाही त्यात मृत्यु झाला होता़. जान्हवी यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यात त्यांनी आपला १५ मार्च २०१० पासून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे म्हटले आहे़. तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही़, लग्न चांगले करुन दिले नाही़. आम्हाला तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी भेटली असती़, तू माहेरी निघून जा असे म्हणून वारंवार मारहाण केली़. पहिल्यांदा गरोदर असताना त्यांना उपाशी ठेवून छळ  केला़. तसेच दुसरा मुलगा झाल्यानंतर संदीप डोंगरे यांनी त्यांना मी याला सांभाळणार नाही, दुसरा मुलगा कशाला जन्माला घातलास असे म्हणून मारहाण केली़. तसेच तुझ्या बापाकडून १० लाख रुपये घे असे म्हणून त्यांना मुलासह घराबाहेर काढले होते़. त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले़ .संदीप हे गेली ५ वर्षे पेस्ट कंट्रोल करण्याचे काम करत असून पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्यांना व मुलांना घरात झोपण्यास भाग पाडून दोन्ही मुलांच्या मृत्युस कारणीभूत झाले असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे़. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जे़. सी़. गडकरी अधिक तपास करत आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू