शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

वडीलच मुलांच्या मृत्यूला जबाबदार : पत्नीची तक्रार, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:30 IST

घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडला होता़.

ठळक मुद्देपतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यु व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल

पुणे : पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्या घरात पत्नी व मुलांना झोपण्यास भाग पाडून मुलांच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी पत्नीने आपल्या पतीविरुद्ध सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे़. सिंहगड पोलिसांनी पतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यु व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी जान्हवी संदीप डोंगरे (वय ३०, रा़. शांतीवन आनंदनगर) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी पती संदीप सेवक डोंगरे, सासू जनाबाई सेवक डोंगरे, सासरे सेवक पंडित डोंगरे, दीर सतीश सेवक डोंगरे, जाऊ ज्योती सतीश डोंगरे (सर्व रा़. शांतीवन, आनंदनगर) आणि मावस सासू अनुसया खटाणे (रा़. बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडला होता़. त्यात सार्थक डोंगरे (वय ९) आणि साहिल डोंगरे (वय ११) यांचा मृत्यू झाला होता़. याबाबतची माहिती अशी, संदिप हे पत्नी व दोन मुलांसोबत आनंदनगर येथील सिद्धार्थ अपार्टमेंट येथे राहतात. ते  तुळजा भवानी इंटरप्रायझेस याठिकाणी पेस्ट कंट्रोलचे काम करतात. त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल करुन ते विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेले. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते परत आले. मात्र, पहाटे अचानक चौघांनाही उलट्यांचा व जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी संदिप यांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या घेतल्या. मात्र, सायंकाळी अचानक सार्थकला रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या. जान्हवी यांनाही त्रास होत होता. सार्थक याला ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाला़. दरम्यान, साहिल हाही बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़. जान्हवी आणि संदीप यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची दुसºया दिवशी सुटका करण्यात आली़. त्यानंतर साहिल याचाही त्यात मृत्यु झाला होता़. जान्हवी यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यात त्यांनी आपला १५ मार्च २०१० पासून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे म्हटले आहे़. तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही़, लग्न चांगले करुन दिले नाही़. आम्हाला तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी भेटली असती़, तू माहेरी निघून जा असे म्हणून वारंवार मारहाण केली़. पहिल्यांदा गरोदर असताना त्यांना उपाशी ठेवून छळ  केला़. तसेच दुसरा मुलगा झाल्यानंतर संदीप डोंगरे यांनी त्यांना मी याला सांभाळणार नाही, दुसरा मुलगा कशाला जन्माला घातलास असे म्हणून मारहाण केली़. तसेच तुझ्या बापाकडून १० लाख रुपये घे असे म्हणून त्यांना मुलासह घराबाहेर काढले होते़. त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले़ .संदीप हे गेली ५ वर्षे पेस्ट कंट्रोल करण्याचे काम करत असून पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्यांना व मुलांना घरात झोपण्यास भाग पाडून दोन्ही मुलांच्या मृत्युस कारणीभूत झाले असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे़. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जे़. सी़. गडकरी अधिक तपास करत आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू