शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

वडीलच मुलांच्या मृत्यूला जबाबदार : पत्नीची तक्रार, पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 19:30 IST

घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडला होता़.

ठळक मुद्देपतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यु व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल

पुणे : पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्या घरात पत्नी व मुलांना झोपण्यास भाग पाडून मुलांच्या मृत्युस कारणीभूत झाल्याप्रकरणी पत्नीने आपल्या पतीविरुद्ध सिंहगड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यात माहेरहून १० लाख रुपये घेऊन येण्यासाठी आपला मानसिक व शारीरिक छळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे़. सिंहगड पोलिसांनी पतीसह ६ जणांविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यु व विवाहितेचा छळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी जान्हवी संदीप डोंगरे (वय ३०, रा़. शांतीवन आनंदनगर) यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी पती संदीप सेवक डोंगरे, सासू जनाबाई सेवक डोंगरे, सासरे सेवक पंडित डोंगरे, दीर सतीश सेवक डोंगरे, जाऊ ज्योती सतीश डोंगरे (सर्व रा़. शांतीवन, आनंदनगर) आणि मावस सासू अनुसया खटाणे (रा़. बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. घरात पेस्ट कंट्रोल केल्याने त्याचा त्रास होऊन डोंगरे कुटुंबातील चौघांनाही त्रास झाला होता़. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी घडला होता़. त्यात सार्थक डोंगरे (वय ९) आणि साहिल डोंगरे (वय ११) यांचा मृत्यू झाला होता़. याबाबतची माहिती अशी, संदिप हे पत्नी व दोन मुलांसोबत आनंदनगर येथील सिद्धार्थ अपार्टमेंट येथे राहतात. ते  तुळजा भवानी इंटरप्रायझेस याठिकाणी पेस्ट कंट्रोलचे काम करतात. त्यांनी घरात पेस्ट कंट्रोल करुन ते विसर्जन मिरवणूक पाहण्यास गेले. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ते परत आले. मात्र, पहाटे अचानक चौघांनाही उलट्यांचा व जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर सोमवारी सकाळी संदिप यांनी रुग्णालयात न जाता बाहेरून गोळ्या घेतल्या. मात्र, सायंकाळी अचानक सार्थकला रक्तांच्या उलट्या सुरू झाल्या. जान्हवी यांनाही त्रास होत होता. सार्थक याला ससून रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यु झाला़. दरम्यान, साहिल हाही बेशुद्ध झाल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़. जान्हवी आणि संदीप यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांची दुसºया दिवशी सुटका करण्यात आली़. त्यानंतर साहिल याचाही त्यात मृत्यु झाला होता़. जान्हवी यांनी आता पोलिसांकडे फिर्याद दिली असून त्यात त्यांनी आपला १५ मार्च २०१० पासून शारीरिक व मानसिक छळ होत असल्याचे म्हटले आहे़. तुझ्या वडिलांनी हुंडा दिला नाही़, लग्न चांगले करुन दिले नाही़. आम्हाला तुझ्यापेक्षा कितीतरी चांगली मुलगी भेटली असती़, तू माहेरी निघून जा असे म्हणून वारंवार मारहाण केली़. पहिल्यांदा गरोदर असताना त्यांना उपाशी ठेवून छळ  केला़. तसेच दुसरा मुलगा झाल्यानंतर संदीप डोंगरे यांनी त्यांना मी याला सांभाळणार नाही, दुसरा मुलगा कशाला जन्माला घातलास असे म्हणून मारहाण केली़. तसेच तुझ्या बापाकडून १० लाख रुपये घे असे म्हणून त्यांना मुलासह घराबाहेर काढले होते़. त्यानंतर ते पुन्हा एकत्र राहू लागले़ .संदीप हे गेली ५ वर्षे पेस्ट कंट्रोल करण्याचे काम करत असून पेस्ट कंट्रोलपासून होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव असतानासुद्धा त्यांना व मुलांना घरात झोपण्यास भाग पाडून दोन्ही मुलांच्या मृत्युस कारणीभूत झाले असे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे़. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जे़. सी़. गडकरी अधिक तपास करत आहेत़ .

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWomenमहिलाDeathमृत्यू