शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

धक्कादायक! तेराव्या मजल्यावरून उडी घेत महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:18 IST

या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

ठळक मुद्देलग्नाच्या ७ वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ती सतत तणावात असायची, असे तिच्या घरच्यांनी सांगितले. याच तणावातून शुक्रवारीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.

मुंबई : इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत ३६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी नागपाडा येथे घडली. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी महिलेचे नाव सांगण्यास नकार दिला. मृत महिला ही मूळची मीरा रोड येथील रहिवासी असून, गेल्या सहा वर्षांपासून तणावात होती. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. लग्नाच्या ७ वर्षांनंतर तिने घटस्फोटाचा निर्णय घेतला. घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर ती आईवडिलांकडे राहायला आली होती. मात्र, नुकतेच तिच्या आईवडिलांचेही निधन झाल्याने ती तणावात होती. तिचा तणाव लक्षात घेऊन काका तिला स्वत:च्या घरी घेऊन गेले. सध्या नागपाडा येथील ऑर्चिड एनक्लेवमध्ये ती काकांच्या घरी राहात होती.

मात्र, ती सतत तणावात असायची, असे तिच्या घरच्यांनी सांगितले. याच तणावातून शुक्रवारीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, हे लक्षात आल्याने कुटुंबीयांनी तिला अडविले. त्यानंतर, शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास इमारतीच्या तेराव्या मजल्यावरून उडी घेत तिने आत्महत्या केली. घटनेची वर्दी मिळताच नागपाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली.

 

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसMumbaiमुंबईDeathमृत्यूWomenमहिला