शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
5
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
6
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
7
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
8
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
9
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
10
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
11
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
12
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
13
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
14
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
15
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
16
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
17
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
18
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
19
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
20
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी

हनीमूनहून येताच महिला डॉक्टर म्हणाली माझा पती गे आहे, पतीने कोर्टात सांगितलं बोर्नविटा कनेक्शन, नेमकं काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 16:13 IST

Family News: एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर मुंबईला गेलं. तिथून हे पती-पत्नी हनीमूनसाठी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे गेले. मात्र हनिमूनहून परत येताच विवाहाचा आनंद कौटुंबिक वादात बदलला.

रायपूर - छत्तीसगडच्या बिलासपूरमधील एक नवविवाहित जोडपं लग्नानंतर मुंबईला गेलं. तिथून हे पती-पत्नी हनीमूनसाठी राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूर येथे गेले. मात्र हनिमूनहून परत येताच विवाहाचा आनंद कौटुंबिक वादात बदलला. डॉक्टर असलेल्या पत्नीने पतीच्या पुरुषार्थावरच शंका उपस्थित केली. पत्नीने आपल्या मित्र आणि पतीच्या सहकाऱ्यांना फोन करून माझा पती गे आहे, असे सांगण्यास सुरुवात केली. आमच्यामध्ये विवाहानंतर कुठल्याही प्रकारचे शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले नाहीत, असा दावाही तिने केला. सुमारे ३ वर्षे जुन्या या प्रकरणाची चर्चा गेल्या सोमवारपासून छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमामात होत आहे. (Coming from the honeymoon, the female doctor said my husband is gay, the husband told the court Bournevita connection, what exactly is the case?)

त्याचे झाले असे की, बिलासपूरमधील रहिवासी असलेल्या एका महिला डॉक्टरचा विवाह २०१८ च्या फेब्रुवारी महिन्यात एका तरुणाशी झाला. लग्नानंतर हा तरुण डॉक्टर पत्नीला घेऊन मुंबईला गेला. त्यानंतर हे दोघेही हनिमूनसाठी जयपूरला गेले. मात्र हनिमूनहून परत आल्यानंतर काही दिवसांनी पती-पत्नीमध्ये वादाला सुरुवात झाली. डॉक्टर पत्नीने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले. तिने आपल्या ओळखीमधील सर्वांना आपला पती गे असल्याचे सांगण्यास सुरुवात केली. तसेच तिने पतीवर हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला.

पत्नीच्या या आरोपांमुळे पतीची बदनामी होऊ लागली. तसेच त्याचे मित्र त्याच्याकडे हीन नजरेने पाहू लागले. त्यानंतर या पतीने रायपूरमधील एका कोर्टात मानहानीचा गुन्हा दाखल केला. पतीने पत्नी आणि तिच्या अन्य एका नातेवाईकाविरोधात आरोप केले. त्यानंतर गेल्या सोमवारी रायपूरच्या कोर्टाने पत्नी आणि तिच्या नातेवाईकांविरोधात समन्स बजावले.

याबाबत पतीने कोर्टात सांगितले की, तो कामानिमित्त मुंबईला असतो. विवाहानंतर तो डॉक्टर पत्नीला घेऊन मुंबईत गेला. पत्नी दिवसभर घरात काहीही काम करत नसे. तसेच तिच्या फोनवर बोर्नविटा नावाने सेव्ह असलेल्या नंबरवर तासनतास गप्पा मारत बसे. पतीने कोर्टात सांगितले की, बोर्नविटा नावाने सेव्ह असलेला हा नंबर डॉ. विवेक उपाध्याय याचा आहे. कॉलेजपासून पत्नी आणि त्याचे प्रेमसंबंध होते. त्यामुळेच पत्नी विवाहानंतरही बिलासपूर येथे राहण्यासाठी आग्रही होती. मात्र मी कॅनडाला जाऊ इच्छित होतो.

पतीने कोर्टात सांगितले की, त्याच्या पत्नीने त्याच्या ऑफिसमध्ये फोन करून माझ्या सहकाऱ्यांना मी गे असल्याचे सांगितले. तसेच विवाहानंतर आमच्यात कुठलेही संबंध प्रस्थापित झाले नसल्याचे सांगितले. ही गोष्ट हळूहळू ऑफिसमध्ये पसरली. त्यामुळे ऑफिसमधील सहकारी माझ्याकडे हीन भावनेने पाहू लागले. पतीने त्याच्या पत्नीवर मद्यपान करून गोंधळ घातल्याचाही आरोप केला. अभिनव याने आपली वैद्यकीय चाचणी करून रिपोर्ट कोर्टात सादर केला. त्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना महिलांशी शरीरसंबंध ठेवण्यास फिट असल्याचे प्रमाणपत्र दिले होते.

दरम्यान, सदर पतीने पत्नीची मोठी बहीण, भाओजी आणि मोठा भाऊ व वडील यांच्याविरोधात भादंवि २०० कलम ५००/३४ अन्वये तक्रार दिली. त्यावरून कोर्टाने सदर महिला डॉक्टर आणि अन्य चार जणांविरोधात गुन्हा दाखल करून समन्स जारी करण्याचा आदेश दिला. 

टॅग्स :FamilyपरिवारrelationshipरिलेशनशिपCourtन्यायालय