शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
3
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
4
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
5
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
6
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
7
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
8
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
9
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
10
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
11
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
12
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
13
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
14
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
15
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
16
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
17
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
18
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
19
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
20
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:41 IST

रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. पत्नीच्या विरहाने आणि वारंवार बोलावूनही ती परत न आल्याने आलेलं नैराश्य यातून या पतीने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीपेट मंडलातील कोनापूर गावातील गोरकांति स्वामी यांचा विवाह चार वर्षांपूर्वी मल्लूपल्ली येथील सिरिशा यांच्यासोबत झाला होता. गोरकांति हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लग्नाची पहिली काही वर्षे दोघांचा संसार सुखात चालला होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून सतत खटके उडत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून सिरिशा काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी मल्लूपल्ली येथे निघून गेली.

विरहाने ग्रासलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

पत्नी माहेरी गेल्यानंतर गोरकांति स्वामी यांनी तिला वारंवार घरी परत येण्यासाठी विनंती केली. मात्र, पत्नी सिरिशाने घरी परतण्यास नकार दिला. याच गोष्टीमुळे गोरकांति स्वामी गेले काही दिवस तीव्र नैराश्यात होते. पत्नी घरी परत न येणं त्यांना असह्य झालं होतं.

आपल्या मनातील ही वेदना सहन न झाल्याने, गोरकांति स्वामी यांनी पेड्डा मल्लारेड्डी गावातील सबस्टेशनजवळ धाव घेतली. तिथे एका झाडाला त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

पोलिसांकडून एफआयआर दाखल तपास सुरू

झाडाला गोरकांति स्वामी यांचा मृतदेह लटकलेला पाहताच गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही या दुर्घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, गोरकांति यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने कोनापूर गावातील लोकांना धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer commits suicide after wife refuses to return home.

Web Summary : Distraught after his wife refused to return home following a quarrel, a farmer in Kamareddy district, Telangana, tragically ended his life by hanging. His despair overwhelmed him, leaving the village in mourning.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार