शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

'घरी ये ना गं...', वारंवार बोलवूनही पत्नी परत येईना; विरहाने कंटाळलेल्या शेतकरी पतीने उचललं टोकाचं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 09:41 IST

रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने टोकाचं पाऊल उचलल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे.

रागावून माहेरी गेलेली पत्नी घरी परत येत नाही म्हणून एका शेतकरी पतीने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात घडली आहे. पत्नीच्या विरहाने आणि वारंवार बोलावूनही ती परत न आल्याने आलेलं नैराश्य यातून या पतीने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीबीपेट मंडलातील कोनापूर गावातील गोरकांति स्वामी यांचा विवाह चार वर्षांपूर्वी मल्लूपल्ली येथील सिरिशा यांच्यासोबत झाला होता. गोरकांति हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. लग्नाची पहिली काही वर्षे दोघांचा संसार सुखात चालला होता.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणांवरून सतत खटके उडत होते. रोजच्या भांडणाला कंटाळून सिरिशा काही दिवसांपूर्वी आपल्या माहेरी मल्लूपल्ली येथे निघून गेली.

विरहाने ग्रासलेल्या पतीने उचललं टोकाचं पाऊल

पत्नी माहेरी गेल्यानंतर गोरकांति स्वामी यांनी तिला वारंवार घरी परत येण्यासाठी विनंती केली. मात्र, पत्नी सिरिशाने घरी परतण्यास नकार दिला. याच गोष्टीमुळे गोरकांति स्वामी गेले काही दिवस तीव्र नैराश्यात होते. पत्नी घरी परत न येणं त्यांना असह्य झालं होतं.

आपल्या मनातील ही वेदना सहन न झाल्याने, गोरकांति स्वामी यांनी पेड्डा मल्लारेड्डी गावातील सबस्टेशनजवळ धाव घेतली. तिथे एका झाडाला त्यांनी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

पोलिसांकडून एफआयआर दाखल तपास सुरू

झाडाला गोरकांति स्वामी यांचा मृतदेह लटकलेला पाहताच गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही या दुर्घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, गोरकांति यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीने इतकं टोकाचं पाऊल उचलल्याने कोनापूर गावातील लोकांना धक्का बसला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Farmer commits suicide after wife refuses to return home.

Web Summary : Distraught after his wife refused to return home following a quarrel, a farmer in Kamareddy district, Telangana, tragically ended his life by hanging. His despair overwhelmed him, leaving the village in mourning.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदार