शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

भयानक स्वप्न पडताहेत, झोप उडालीय! चिठ्ठी लिहून चोरट्यांनी परत केल्या मौल्यवान मूर्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 2:53 PM

आठवड्यापूर्वी चोरीला गेलेल्या मूर्ती परत मिळाल्या; चोरट्यांनी परत आणून ठेवल्या

चित्रकूट: उत्तर प्रदेशच्या चित्रकूटमध्ये एक अजब घटना घडली आहे. बालाजी मंदिरातून लाखो रुपयांचं मूल्य असलेल्या मूर्ती चोरीला गेल्या. आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. चोरीला गेलेल्या मूर्ती माणिकपूरमधील महावीरनगरातील महंतांच्या घराबाहेर सापडल्या आहेत. या मूर्ती महंतांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या. मात्र अष्टधातूच्या मूर्ती अद्यापही सापडलेल्या नाहीत.  

शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या बालाजी मंदिरातून ९ मे रोजी अष्ट धातू, तांबं आणि पितळ्याच्या १६ मूर्ती चोरीला गेल्या. मंदिराचं कुलूप तोडून चोरांनी अष्टधातूपासून तयार करण्यात आलेल्या श्रीरामाची ५ किलोची मूर्ती, राधाकृष्णाची पितळेची मूर्ती, बालाजी आणि लड्डू गोपालाच्या मूर्तीसह रोख रक्कम आणि चांदीचं सामान लंपास केलं, अशी माहिती मंदिराचे महंत राम बालक दास यांनी दिली. पुजाऱ्याची पत्नी सकाळी मंदिरात साफसफाई करण्यासाठी पोहोचली. त्यावेळी तिला मंदिराचं कुलूप तुटलं असल्याचं आणि मूर्ती चोरीला गेल्याचं लक्षात आलं.

घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. चोरीला गेलेल्या मूर्ती शनिवारी महंतांच्या घराबाहेर आढळून आल्या. महंत राम बालक दास गायींना चारा घालण्यासाठी जात असताना त्यांना एक चिठ्ठी सापडली. मूर्ती चोरी केल्यापासून आम्हाला झोप येत नाहीए. भयानक स्वप्न पडत आहेत. त्यामुळे मूर्ती परत करत आहोत. या मूर्तींची मंदिरात प्रतिष्ठापना करा, असा मजकूर चिठ्ठीत होता.

चिठ्ठी वाचल्यानंतर महंत राम बालक दास यांनी मूर्ती शोधण्यास सुरुवात केली. घराच्या बाहेर असलेल्या टोपलीखाली त्यांना मूर्ती दिसल्या. एका गोणीमध्ये मूर्ती ठेवलेल्या होत्या. पितळ आणि तांब्याच्या १२ मूर्ती त्यांना आढळल्या. मात्र अष्टधातूच्या दोन मूर्ती सापडल्या नाहीत. महंतांनी मूर्ती सापडल्याची माहिती पोलिसांना दिली आणि मूर्ती त्यांना सुपूर्द केल्या.