शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

भिवंडीत अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याची सुखरूप सुटका करण्यात शहर पोलिसांना यश

By नितीन पंडित | Updated: January 28, 2023 01:25 IST

हनुमान नगर कामतघर येथील सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धूत होत्या. त्या वळी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते.

भिवंडी : शहरात २६ डिसेंबर रोजी कामतघर परिसरातून अपहरण झालेल्या दीड वर्षीय चिमुरड्याचा शोध लावण्यात शहर पोलिसांना यश आले असून विक्री करण्यासाठी चिमुरड्याची चोरी करणाऱ्या एक व्यक्तीसह दोन महिलांना पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.

हनुमान नगर कामतघर येथील सुंदरी रामगोपाल गौतम या घरात कपडे धूत होत्या. त्या वळी त्यांचा दीड वर्षांचा मुलगा सिद्धांत घराबाहेर खेळत असताना त्याचे अपहरण झाले होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात २६ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला असता घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके व वरिष्ठ पो. निरीक्षक चेतन काकडे यांच्या नेतृत्वाखाली पोउपनि रविंद्र पाटील,पो हवा खाडे, राणे, भोसले, पवार, कोदे, नंदिवाले, हरणे, गावीत यांचे पथक तयार करून नेपाळ सीमेपर्यंत तपास करीत असता एका मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक तपासाने संशयित गणेश नरसय्या मेमुल्ला वय ३८ रा. भाग्य नगर,कामतघर यास ताब्यात घेऊन त्याकडे कसून चौकशी केली. त्याने मूल चोरी करून १ लाख ५ हजार रुपयांना विक्री केल्याचे कबूल केले. 

यानंतर पोलीस पथकाने पद्मानगर नवजीवन कॉलनी या परिसरात राहणाऱ्या भारती सुशील शाहु वय ४१ व आशा संतोष शाहु वय ४२ वर्ष या दोघींना ताब्यात घेऊन त्यांच्या जवळून चिमुरड्याची सुखरूप सुटका करत गुरुवारी रात्री पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी चिमुरड्यास आईवडिलांच्या हाती सुखरूप स्वाधीन केले.या तिघां विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आले आहे .

चिमुरड्यास एक लाखात विक्री भारती सुशील शाहु व आशा संतोष शाहु या दोघी बहिणी असून आशा हिस मूल नसल्याने तिने मूल विकत घेण्याचा निर्णय घेतला.तो तिने बहीण भारतीस बोलून दाखवला भारती ची ओळख गणेश नरसय्या मेमुल्ला या सोबत असल्याने त्यांनी हा कट रचून मूल चोरी करून विक्री करण्याचा निर्णय घेतला व त्यानंतर गणेश मेमुल्ला याने हनुमान नगर परिसरात टेहळणी करून लहान मूल हेरले त्यामध्ये सिद्धांत हा त्याच्या नजरेत आला व त्याने त्याचे अपहरण करून विक्री केल्याचे तपासात उघड झाले आहे.

मुलाला पाहताच आईवडीलांच्या डोळ्यात आनंदाश्रू ....२६ डिसेंबर रोजी सिद्धांत हरविल्या पासून पानपट्टी चालवीणारे त्याचे वडील रामगोपाल व आई सुंदरी वेडेपिसे झाले होते .पोलीस तपास करीत असताना आई वडील सुध्दा शोध घेत वणवण फिरत होते .स्वतः जवळ गाडी नसताना शेजाऱ्यां कडून गाडी घेऊन व्यवसाय बंद करून मुंबई ठाणे कल्याण भिवंडी या परिसरात शोधून त्रस्त झाले होते. आई त्या धक्क्याने आजारी पडल्याने आठ दिवस रुग्णालयात दाखल करावे लागले.२६ जानेवारी रोजी दोघे आईवडील भिवंडी शहरात शांतीनगर गैबी नगर परिसरात शोधून रात्री दहा वाजता घरी परतले.डोळ्यात दुःख भरलेले असताना शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांनी मोबाईल वर फोन करून पोलीस ठाण्यात बोलावून घेतले व त्यांच्या समोर चिमुरड्यास हजर केल्यानंतर आईवडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला.ते आनंदाश्रू पोलिसांच्या शोधा मुळे शक्य झाले असे सांगत सुंदरी गौतम यांनी पोलिसांच्या सहकार्या बद्दल आनंद व्यक्त केला .

पोलीस उपायुक्तांनी केला पोलीस पथकाचा सन्मानशहर पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकांनी महिनाभर या मुलाच्या शोधासाठी अथक प्रयत्न केले होते पोलिसांच्या प्रयत्नांना यश येत डबल एक महिन्यांनी मुलाची सुखरूप सुटका करून आई-वडिलांच्या स्वाधीन केल्याने भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी शहर पोलीस ठाण्यातील पोलीस पथकाचा पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देत सन्मान केला

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसbhiwandiभिवंडी