शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:56 IST

Train Crushes four children's: चार मुलांना आधी चिप्स आणि कोक दिले. त्यानंतर बाप त्यांना रेल्वे रुळावर घेऊन गेला. रेल्वे येत असल्याचे बघून बाप चारही मुलांसह रुळावर उभा राहिला. एक्स्प्रेस जवळ येत असल्याचे पाहून मुलं ओरडू लागली, पण बापाने त्यांना हलूच दिलं नाही. घट्ट धरून ठेवलं आणि क्षणात त्यांच्या चिंधड्या उडाल्या.

Crime News: एक ३६ वर्षांचा व्यक्ती त्याच्या चार मुलांना घेऊन रेल्वे रुळावर आला. सर्वात मोठ्या मुलाचे वय ९ वर्ष, तर सर्वात लहान मुलाचे वय तीन वर्ष. चार मुलांना घेऊन पार्कमध्ये जाण्याऐवजी तो रेल्वे जात असलेल्या एका पुलाखाली येऊन बसला. त्याने मुलांना चिप्स आणि कोल्ड्रिंग दिले. तिथे बराच वेळ वाट बघत बसला. रेल्वे येत असल्याचे बघितल्यानंतर चारही मुलांना घेतलं रुळावर जाऊन उभा राहिला. मुलं ओरडायला लागली. आणि पळण्यासाठी धडपड करू लागली. पण, बापाने त्यांना घट्ट धरून ठेवलं. मुंबईकडून अमृतसरकडे निघालेली गोल्डन एक्स्प्रेस वायू वेगाने आली आणि चिरडून गेली. चारही निष्पाप मुलांच्या चिंधड्या उडाल्यानंतर घटनास्थळावरील दृश्य पिळवटून टाकणारे होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही घटना आहे हरयाणातील फरिदाबादमधील. मंगळवारी दुपारच्या वेळी व्यक्तीने आपल्या चार मुलांसह रेल्वे समोर उभं राहुन आत्महत्या केली. पाच जणांचाही जागेवरच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीने मुलांसाठी चिप्स आणि कोल्ड्रिंक खरेदी केले होते. 

पत्नीसोबत वाद, मुलांना घेऊन आला रुळावर

मनोज महतो असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. बल्लभगडमधील सुभाष कॉलनीमध्ये तो पत्नी आणि चार मुलांसह भाड्याने घेतलेल्या घरात राहत होता. 

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, मनोज त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात वाद होत. मंगळवारी (१० जून) सकाळीही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मुलांना पार्कमध्ये घेऊन चाललोय असे सांगून घरातून बाहेर पडला. 

मुंबई-अमृतसर गोल्डन एक्स्प्रेस समोर केली आत्महत्या

जीआरपी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी जवळपास १ वाजून २० मिनिटांनी मुंबईवरून आलेली गोल्डन एक्स्प्रेस अमृतसरच्या दिशेने जात होती. त्यावेळी ही घटना घडली. रेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला मृतदेह अस्ताव्यस्थ पडलेले होते. अनेक अयवय तुटून पडले होते. पोलिसांनी सगळ्यांच्या मृतदेहाचे अवयव जमा केले. 

खिशात मिळाली चिठ्ठी

मयत व्यक्तीच्या कपड्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यात आधार कार्ड आणि एक चिठ्ठी मिळाली. आधार कार्डवरून त्याची ओळख मनोज महतो असल्याचे स्पष्ट झाले. तर चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या नंबर समोर लिहिलेले होते पत्नीचा नंबर. पोलिसांनी कॉल करून माहिती घेतली आणि चौघांची ओळख पटली. 

पोलिसांनी महिलेला कॉल केला आणि विचारले की, मनोज तुमचा कोण लागतो? महिलेने सांगितले की, ते माझे पती आहेत. ते मुलांना पार्कमध्ये घेऊन गेले आहेत. पोलीस महिलेला म्हणाले की, रेल्वे रुळाकडे या अपघात झाला आहे. महिलेने विचारले कसा झाला? पोलिसांनी सांगितले की, रेल्वे अपघात झाला आहे. 

त्यानंतर महिला घटनास्थळी आली. पती आणि चार मुलांचे तुकडे तुकडे झालेले मृतदेह बघून हंबरडा फोडला. हे दृश्य बघून महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला शुद्धीवर आणण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेPoliceपोलिस