शहरं
Join us  
Trending Stories
1
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
2
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
3
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
4
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
5
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
6
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
7
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
8
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
9
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
10
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
11
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
12
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
13
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
14
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
15
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
16
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
17
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
18
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
19
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
20
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध

हातात चिप्स अन् कोल्ड्रिंक; चार मुलांसह बाप रुळावर राहिला उभा, मुंबई-अमृतसर एक्स्प्रेस येताच उडाल्या चिंधड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 15:56 IST

Train Crushes four children's: चार मुलांना आधी चिप्स आणि कोक दिले. त्यानंतर बाप त्यांना रेल्वे रुळावर घेऊन गेला. रेल्वे येत असल्याचे बघून बाप चारही मुलांसह रुळावर उभा राहिला. एक्स्प्रेस जवळ येत असल्याचे पाहून मुलं ओरडू लागली, पण बापाने त्यांना हलूच दिलं नाही. घट्ट धरून ठेवलं आणि क्षणात त्यांच्या चिंधड्या उडाल्या.

Crime News: एक ३६ वर्षांचा व्यक्ती त्याच्या चार मुलांना घेऊन रेल्वे रुळावर आला. सर्वात मोठ्या मुलाचे वय ९ वर्ष, तर सर्वात लहान मुलाचे वय तीन वर्ष. चार मुलांना घेऊन पार्कमध्ये जाण्याऐवजी तो रेल्वे जात असलेल्या एका पुलाखाली येऊन बसला. त्याने मुलांना चिप्स आणि कोल्ड्रिंग दिले. तिथे बराच वेळ वाट बघत बसला. रेल्वे येत असल्याचे बघितल्यानंतर चारही मुलांना घेतलं रुळावर जाऊन उभा राहिला. मुलं ओरडायला लागली. आणि पळण्यासाठी धडपड करू लागली. पण, बापाने त्यांना घट्ट धरून ठेवलं. मुंबईकडून अमृतसरकडे निघालेली गोल्डन एक्स्प्रेस वायू वेगाने आली आणि चिरडून गेली. चारही निष्पाप मुलांच्या चिंधड्या उडाल्यानंतर घटनास्थळावरील दृश्य पिळवटून टाकणारे होते. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही घटना आहे हरयाणातील फरिदाबादमधील. मंगळवारी दुपारच्या वेळी व्यक्तीने आपल्या चार मुलांसह रेल्वे समोर उभं राहुन आत्महत्या केली. पाच जणांचाही जागेवरच मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीने मुलांसाठी चिप्स आणि कोल्ड्रिंक खरेदी केले होते. 

पत्नीसोबत वाद, मुलांना घेऊन आला रुळावर

मनोज महतो असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो मूळचा बिहारचा आहे. बल्लभगडमधील सुभाष कॉलनीमध्ये तो पत्नी आणि चार मुलांसह भाड्याने घेतलेल्या घरात राहत होता. 

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासातून अशी माहिती समोर आली की, मनोज त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात वाद होत. मंगळवारी (१० जून) सकाळीही त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर मुलांना पार्कमध्ये घेऊन चाललोय असे सांगून घरातून बाहेर पडला. 

मुंबई-अमृतसर गोल्डन एक्स्प्रेस समोर केली आत्महत्या

जीआरपी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी दुपारी जवळपास १ वाजून २० मिनिटांनी मुंबईवरून आलेली गोल्डन एक्स्प्रेस अमृतसरच्या दिशेने जात होती. त्यावेळी ही घटना घडली. रेल्वेच्या मोटरमनने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. 

रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी रेल्वे रुळावर आणि आजूबाजूला मृतदेह अस्ताव्यस्थ पडलेले होते. अनेक अयवय तुटून पडले होते. पोलिसांनी सगळ्यांच्या मृतदेहाचे अवयव जमा केले. 

खिशात मिळाली चिठ्ठी

मयत व्यक्तीच्या कपड्यांची पोलिसांनी तपासणी केली. त्यात आधार कार्ड आणि एक चिठ्ठी मिळाली. आधार कार्डवरून त्याची ओळख मनोज महतो असल्याचे स्पष्ट झाले. तर चिठ्ठीवर एक मोबाईल नंबर लिहिलेला होता. त्या नंबर समोर लिहिलेले होते पत्नीचा नंबर. पोलिसांनी कॉल करून माहिती घेतली आणि चौघांची ओळख पटली. 

पोलिसांनी महिलेला कॉल केला आणि विचारले की, मनोज तुमचा कोण लागतो? महिलेने सांगितले की, ते माझे पती आहेत. ते मुलांना पार्कमध्ये घेऊन गेले आहेत. पोलीस महिलेला म्हणाले की, रेल्वे रुळाकडे या अपघात झाला आहे. महिलेने विचारले कसा झाला? पोलिसांनी सांगितले की, रेल्वे अपघात झाला आहे. 

त्यानंतर महिला घटनास्थळी आली. पती आणि चार मुलांचे तुकडे तुकडे झालेले मृतदेह बघून हंबरडा फोडला. हे दृश्य बघून महिला बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला शुद्धीवर आणण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेPoliceपोलिस