शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या; भोपाळमधील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:37 IST

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे.

भोपाळ: आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे सर्वकाही आहे फक्त वेळ नाही. नात्यांना वेळ दिल्यानेच नाती बळकट होतात आणि त्यामुळेच आपुलकी वाढत असते. त्यामुळे एक चांगलं नातं टिकण्यासाठी त्या नात्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोकांकडे पैशांची श्रीमंती पाहायला मिळते पण अनेकजण वेळेच्या श्रीमंतीपासून खूप दुरावले आहेत. काहींना आपल्या जवळच्या नातेवाईकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. कारण इथे आई-वडील आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे. सुसाईड नोटमधील माहितीनुसार, त्याचे पालक त्याला पुरेसा वेळ देत नव्हते, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये बारावीतील विद्यार्थ्याने लिहले आहे की, माझे आई-वडील आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडे माझ्यासाठी वेळ नाही, ते नेहमी व्यस्त असतात, त्यांनी मला सर्वकाही दिलं आहे मला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. फक्त त्यांनी मला वेळ दिला नाही. याशिवाय त्याने तमाम पालकांना विनंती देखील केली की आपल्या मुलांना वेळ द्या, नाहीतर माझ्यासारखेच एक दिवशी ते हे सगळं एका कागदावर लिहून जातील.

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे कारण पालकांनी मुलाला वेळ दिला नाही म्हणून मुलाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले. या मृत मुलाचे वडील प्रोफेसर आहेत आणि आई एका ऑफिसमध्ये जॉब करत आहे. त्यामुळे दोघेही आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. मुलाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, दहावीमध्ये त्याला ९७ टक्के गुण मिळाले होते. तो बारावीच्या परीक्षेची तयारी करत-करत आयआयटीची देखील तयारी करत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीDeathमृत्यू