शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या; भोपाळमधील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:37 IST

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे.

भोपाळ: आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे सर्वकाही आहे फक्त वेळ नाही. नात्यांना वेळ दिल्यानेच नाती बळकट होतात आणि त्यामुळेच आपुलकी वाढत असते. त्यामुळे एक चांगलं नातं टिकण्यासाठी त्या नात्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोकांकडे पैशांची श्रीमंती पाहायला मिळते पण अनेकजण वेळेच्या श्रीमंतीपासून खूप दुरावले आहेत. काहींना आपल्या जवळच्या नातेवाईकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. कारण इथे आई-वडील आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे. सुसाईड नोटमधील माहितीनुसार, त्याचे पालक त्याला पुरेसा वेळ देत नव्हते, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये बारावीतील विद्यार्थ्याने लिहले आहे की, माझे आई-वडील आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडे माझ्यासाठी वेळ नाही, ते नेहमी व्यस्त असतात, त्यांनी मला सर्वकाही दिलं आहे मला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. फक्त त्यांनी मला वेळ दिला नाही. याशिवाय त्याने तमाम पालकांना विनंती देखील केली की आपल्या मुलांना वेळ द्या, नाहीतर माझ्यासारखेच एक दिवशी ते हे सगळं एका कागदावर लिहून जातील.

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे कारण पालकांनी मुलाला वेळ दिला नाही म्हणून मुलाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले. या मृत मुलाचे वडील प्रोफेसर आहेत आणि आई एका ऑफिसमध्ये जॉब करत आहे. त्यामुळे दोघेही आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. मुलाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, दहावीमध्ये त्याला ९७ टक्के गुण मिळाले होते. तो बारावीच्या परीक्षेची तयारी करत-करत आयआयटीची देखील तयारी करत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीDeathमृत्यू