शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या; भोपाळमधील धक्कादायक घटना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 12:37 IST

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे.

भोपाळ: आजच्या धावपळीच्या जगात लोकांकडे सर्वकाही आहे फक्त वेळ नाही. नात्यांना वेळ दिल्यानेच नाती बळकट होतात आणि त्यामुळेच आपुलकी वाढत असते. त्यामुळे एक चांगलं नातं टिकण्यासाठी त्या नात्याला पुरेसा वेळ देणं खूप गरजेचं आहे. आजकाल लोकांकडे पैशांची श्रीमंती पाहायला मिळते पण अनेकजण वेळेच्या श्रीमंतीपासून खूप दुरावले आहेत. काहींना आपल्या जवळच्या नातेवाईकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. याचाच प्रत्यय देणारी एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली आहे. कारण इथे आई-वडील आपल्याला वेळ देऊ शकत नाहीत म्हणून बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे. सुसाईड नोटमधील माहितीनुसार, त्याचे पालक त्याला पुरेसा वेळ देत नव्हते, त्यामुळे त्याने आत्महत्या करण्याचा मार्ग अवलंबला. पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये बारावीतील विद्यार्थ्याने लिहले आहे की, माझे आई-वडील आणि घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडे माझ्यासाठी वेळ नाही, ते नेहमी व्यस्त असतात, त्यांनी मला सर्वकाही दिलं आहे मला कशाचीच कमतरता भासू दिली नाही. फक्त त्यांनी मला वेळ दिला नाही. याशिवाय त्याने तमाम पालकांना विनंती देखील केली की आपल्या मुलांना वेळ द्या, नाहीतर माझ्यासारखेच एक दिवशी ते हे सगळं एका कागदावर लिहून जातील.

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या

हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे कारण पालकांनी मुलाला वेळ दिला नाही म्हणून मुलाने टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपवले. या मृत मुलाचे वडील प्रोफेसर आहेत आणि आई एका ऑफिसमध्ये जॉब करत आहे. त्यामुळे दोघेही आपल्या मुलाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. मुलाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता, दहावीमध्ये त्याला ९७ टक्के गुण मिळाले होते. तो बारावीच्या परीक्षेची तयारी करत-करत आयआयटीची देखील तयारी करत होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशStudentविद्यार्थीDeathमृत्यू