शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

राज्यभरात १३० ठिकाणी गुरे चोरणारी चार जणांची टोळी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 23:13 IST

चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्‍या पशुधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली होती.

चाळीसगाव जि. जळगाव  : जळगावसह राज्यभरातील १३०  ठिकाणी गुरांची चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीस चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी  जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव त्याप्रमाणे नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातही गुरे चोरीची कबुली दिली आहे. त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत ३३ गुरे  आणि गुन्ह्यात वापरलेली वाहनेदेखील जप्त करण्यात आली आहेत.

सलीम मोहंमद शरीफ (रा.हुडको कॉलनी,मालेगाव), मन्नान शेख जब्बाद शेख (रा.मालदा शिवार,मालेगाव), फौजान शेख फारुख (रा.वीस फुटी रोड,मालेगाव) आणि सलमान खान दस्तगीर खान (रा.मदरसा शाळेजवळ, मालेगाव) अशी या आरोपींची नावे आहेत. चाळीसगाव तालुक्यात सातत्याने होणार्‍या पशुधन चोरीनंतर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी नाकाबंदी केली होती. यात रोहिणी गावाजवळील एका हॉटेलजवळ गुरे चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली होती. या टोळीची सखोल चौकशी केल्यानंतर राज्यभरात या टोळीने धुमाकूळ घातल्याचे उघड झाले होते. 

चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील नऊ, मेहुणबारे हद्दीतील तीन व चाळीसगाव शहर पोलिस ठाणे हद्दीतील दोन ठिकाणाहून आरोपींनी गुरांची चोरी केल्याचे तपासात उघड झाले तसेच नाशिक, धुळे व औरंगाबाद भागातील २० ठिकाणावरून आरोपींनी गुरे चोरुन नेले होते. 

संशयितांनी विविध ठिकाणाहून चोरलेली एकूण ३३ गुरांची विक्री मालेगाव येथे केली होती. त्यात सात मोठ्या गायी, आठ कालवडी, १२ गोर्‍हे, सहा वासरांचा समावेश आहे.  तसेच गुन्ह्यातील वाहन (क्र.एम.एच.03 सी.बी.५२३१) व दुचाकी (एम.एच.४१ ए.एच.२६९४) जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, अटकेतील आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.