शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

26/11 Terror Attack : कसाबविरुद्धचा खटला फक्त १ रुपयात लढला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2018 4:37 PM

महाले यांनी महाराष्ट्र सदानाच्या उदासीनतेबाबतही राग व्यक्त केला. २६ एप्रिल २०११ ला दोन अंमलदारासोबत ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात गेले. तिथे नियमाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र दिले. तेथे पाहून तेथे असलेल्या व्यक्तीने त्यांना खोल्या उपलब्ध नसल्याचे सांगितले.

ठळक मुद्देर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांच्याशी भेट झाली. तेव्हा, लाखांच्या घरात फी आकारणारे सुब्रमण्यम यांनी अवघ्या १ रुपयात हा खटला लढविला.   विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुब्रमण्यम यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा माझी फी तुम्हाला परवडणार आहे काय? असा प्रश्न सुब्रमण्यम यांनी विचारला.मे २०१२ ला पुन्हा हाच अनुभव आला. त्यांनी तपासले असता तेव्हा तेथे राहत असलेल्या व्यक्ती शासकीय सेवेतही नव्हत्या. ते केवळ कुटुंब दिल्ली फिरण्यासाठी आल्याचे महाले यांनी सांगितले. या सर्वांचा उल्लेख त्यांच्या पुस्तकातही केला आहे. 

मुंबई - २६/११ हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाबला फाशीची शिक्षा सुनाविल्यानंतर त्याने उच्च न्यायालयात आव्हान केले. तेथेही फाशी कायम झाली. पुढे सर्वोच्च न्यायालयात खटला कोण लढविणार असा प्रश्न असताना सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील गोपाल सुब्रमण्यम यांच्याशी भेट झाली. तेव्हा, लाखांच्या घरात फी आकारणारे सुब्रमण्यम यांनी अवघ्या १ रुपयात हा खटला लढविला.   

 २६/११ चे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी दिलेल्या माहितीनुसार कसाबने सर्वोच्च न्यायालयात फाशीच्या शिक्षेला आव्हान दिल्यानंतर सरकारची बाजू कोण मांडणार? हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सुब्रमण्यम यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा माझी फी तुम्हाला परवडणार आहे काय? असा प्रश्न सुब्रमण्यम यांनी विचारला. तेव्हा तुमची फी किती ते सांगा असे निकम यांनी सांगताच फॅक्स क्रमांक मागवून घेतला.  

सुब्रमण्यम यांची एका दिवसाची फी लाख रुपये असते. त्यामुळे ते किती रुपये सांगताच, याबाबत चिंता सुरु असताना सुब्रमण्यम यांचा मेल धडकला. त्यामध्ये त्यांनी १ रुपया.. असा फीचा उल्लेख केला होता. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु होण्यापूर्वी प्राथमिक तयारीसाठी दिल्ली जाणे वाढले. यादरम्यानही सुब्रमण्यम यांनीच खाण्या पिण्याची व्यवस्था केली. सुनावणी दरम्यानही त्यांनीच जेवणाचा खर्च उचलल्याचा अनुभव  महाले यांनी सांगितला.   

महाराष्ट्र सदानाची  उदासीनता...  

तपासासाठी दिल्लीवाऱ्या वाढल्याने ते दिल्लीतील जुन्या महाराष्ट्र सदनात थांबायचे. यादरम्यान महाले यांनी महाराष्ट्र सदानाच्या उदासीनतेबाबतही राग व्यक्त केला. २६ एप्रिल २०११ ला दोन अंमलदारासोबत ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात गेले. तिथे नियमाप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र दिले. तेथे पाहून तेथे असलेल्या व्यक्तीने त्यांना खोल्या उपलब्ध नसल्याचे सांगितले. आरक्षण आहे असे सांगताच त्यांनी सादर केलेल्या पत्रातली शेवटची लाईन वाचून दाखवली. तेव्हा, त्यात खोली उपलब्ध असल्यास देणे असे नमूद करण्यात आले होते.  त्यामुळे पुढचे ३ दिवस त्यांना एका खासगी हॉटेलात थांबावे लागले. ३ दिवसांचे साडे सात हजार रुपये भरावे लागले. त्यात जेवणाचा खर्च वेगळा. मात्र, सदनात रहायला जागा मिळाली असती, तर अवघ्या १०० रुपयांत काम झाले असते. १० मे २०१२ ला पुन्हा हाच अनुभव आला. त्यांनी तपासले असता तेव्हा तेथे राहत असलेल्या व्यक्ती शासकीय सेवेतही नव्हत्या. ते केवळ कुटुंब दिल्ली फिरण्यासाठी आल्याचे महाले यांनी सांगितले. या सर्वांचा उल्लेख त्यांच्या पुस्तकातही केला आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाadvocateवकिलCourtन्यायालय