शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

कसाबला जिवंत पकडणे पोलिसांची सर्वोच्च कामगिरी : रमेश महाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 8:04 PM

कसाब प्रकरणाने आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हे जगाला दाखवून दिले.

औरंगाबाद : जगात जेवढे काही दहशतवादी हल्ले झालेत त्यात दहशतवादी जिवंत पकडला गेला नाही. मात्र, २६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यात अवघ्या पावणेतीन तासांत दहशतवादी कसाबला जिवंत पकडण्यात मुंबईपोलिसांना यश आले. ही मुंबई पोलिसांची आजपर्यंतची सर्वोच्च कामगिरी आहे, असे या प्रकरणाचे मुख्य तपास अधिकारी व निवृत्त पोलीस निरीक्षक रमेश महाले यांनी येथे सांगितले. 

विवेक विचार मंचतर्फे संविधान दिनानिमित्त समाजजागृती मेळावा व ‘२६/११ दहशतवादी हल्ला : कसाब आणि तपास’ या व्याख्यानाचे आयोजन केले होते. भानुदासराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी न्यायाधीश प्रमोद आंबेकर होते. रमेश महाले यांनी ओघवत्या व सोप्या शैलीत २६/११ चा संपूर्ण घटनाक्रम व त्यानंतरचा तपास व कसाबला फाशीची शिक्षा होईपर्यंतची तपशीलवार माहिती दिली. भारतात आजपर्यंत जेवढे पाकिस्तान पुरस्कृत हल्ले झाले ते हल्ले त्यांच्या देशातील दहशवाद्यांनी केल्याचे पाकिस्तानने कधीच मान्य केले नाही; पण कसाबचे आम्ही एवढे पुरावे दिले की, अडीच महिन्यांनंतर पाकिस्तानने कसाब त्यांच्यात देशातील आहे, हे पहिल्यांदा मान्य केले. कसाब प्रकरणाने आपली न्यायव्यवस्था किती सक्षम आहे, हे जगाला दाखवून दिले. २,२०० साक्षीदार होते. त्यातील ६५८ साक्षीदारांची तपासणी झाली. एकही साक्षीदार फुटला नाही, हे उल्लेखनीय. यात कसाब एकटा नव्हता, तर लष्कर- ए-तोयबा, पाकिस्तान मिलिटरी व आयएसआय या तिघांच्या सहभागाने २६/११ चा हल्ला झाला. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुकाराम ओंबळे यांनी कसाबला असे पकडून ठेवले की, त्यास जागचे हालू दिले नाही. यात ओंबळे शहीद झाले.  

मुंबई पोलीस तपास यंत्रणेतील ९८ लोकांनी एकही दिवस सुटी न घेता सलग ९० दिवसांत ११,३५० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. दहशतवादी हल्ल्यात १५५ कोटी ७३ लाख रुपयांचे नुकसान झाले. दहशतवाद्यांकडील २३३ वस्तूंपैकी १५० वस्तू  ‘मेड इन पाकिस्तान’ होत्या. या तपासाशी निगडित अशा अनेक बाबींविषयी महाले यांनी माहिती दिली. दहशतवादी डेव्हिड हेडली याने मुंबईची रेकी करून पाकिस्तानाला माहिती दिली होती की, २६ नोव्हेंबर २००८ रोजी भारत- इंग्लंड क्रिकेट मॅच आहे. त्यादिवशी बोरीबंदरावर अत्यंत कमी लोक असतील. ती वेळ दहशतवाद्यांना बंदरावर उतरण्यास सुरक्षित राहील. यामुळे दहशतवाद्यांनी तो दिवस निवडल्याचे महाले म्हणाले.

घटनादुरुस्ती करताना सर्वांनी सजग राहावे - माजी जिल्हा न्यायाधीश प्रमोद आंबेकर यांनी सांगितले की, सत्ताधारी राजकीय पक्ष बहुसंख्येच्या बळावर राज्यघटना दुरुस्ती करत असतात.राजकीय फायद्यासाठी घटनादुरुस्ती करता येत नाही. हा राज्यघटनेवरील हल्लाच होय. राज्यघटना दुरुस्ती करताना मूळ गाभ्यात बदल करू नये, यासाठी सर्व जनतेने सजग राहणे आवश्यक आहे. 

टॅग्स :MumbaiमुंबईterroristदहशतवादीPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र