शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

लग्नाच्या 10 दिवसांनंतर नवी नवरी प्रियकरासोबत गेली पळून, सोबत दागिनेही घेऊन गेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 16:03 IST

Bride Ran Away : तरूण आणि तरूणी महाराजगंज जिल्ह्यातील परतावल भागात राहणारे आहेत. या लग्नामुळे नाराज तरूणीच्या प्रियकराने तिच्या सासरी जाऊन गोंधळही घातला होता.

Bride Ran Away : उत्तर प्रदेशच्या महाराजगंज जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे लग्नाच्या 10 दिवसांनंतर नवी नवरी तिच्या प्रियकरासोबत पळून गेल. असं सांगितलं जात आहे की, ती तिच्यासोबत 50 हजार रूपये कॅश, दागिने आणि मोबाइल फोन घेऊन फरार झाली. या घटनेनंतर परिसरात हीच चर्चा रंगली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेऊन चौकशी सुरू केली आहे. तरूणीचं लग्न 25 ऑक्टोबरला झालं होतं.

तरूण आणि तरूणी महाराजगंज जिल्ह्यातील परतावल भागात राहणारे आहेत. या लग्नामुळे नाराज तरूणीच्या प्रियकराने तिच्या सासरी जाऊन गोंधळही घातला होता. त्यानंतर तरूणीच्या सासरच्या लोकांनी तिच्या घरातील लोकांना या घटनेची माहिती दिली होती. सोबत असंही विचारलं की, जर तुमच्या मुलीचं प्रेम प्रकरण होतं तर मग तिचं लग्न का लावून दिलं. तसेच ते आपल्या मुलीला घरी परत घेऊन जा असंही म्हणाले.

यानंतर नवरीच्या वडिलांनी तिच्या प्रियकराविरोधात पोलिसात तक्रार दिली. तसेच हा तरूण आपल्या विवाहित मुलीला त्रास देत असल्याचं आणि तिची छेड काढत असल्याचंही सांगितलं. पण शनिवारी सकाळी नवरी आपल्या माहेरून फरार झाली. सोबतच घरातील 50 हजार रूपयेही सुद्धा तिने सोबत नेले. हे पैसे घर बांधण्यासाठी ठेवले होते. सासरकडून मिळालेले लाखो रूपयांचे दागिने आणि फोनही ती घेऊन गेली.

पोलीस या केसची गंभीरतेने चौकशी करत आहेत. पोलिसांनी सांगितलं की, तरूणी तिचा प्रियकर यांच्या लग्नाआधीपासून संबंध होते. त्याने तिच्या सासरी जाऊन मोठा गोंधळ घातला होता. आता दोघेही फरार आहेत. त्यांचा शोध घेणं सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी