शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

लग्न मोडले म्हणून कुटूंबियांवर टाकला बहिष्कार; दहा जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 21:00 IST

Jaat Panchayat : मांडवा येथील जात पंचायतीचा अजब निर्णय

उमरेड : मे २०२० ला शुभमंगल ठरल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली होती. अशातच लॉकडाऊनमुळे लग्न पुढे ढकलल्या गेले. आर्थिक परिस्थितीच्या कारणावरून वधुकडील कुटूंबियांनी लग्नापूर्वीचा झालेला ७० हजार रुपयांचा खर्च नवरदेवाला मागितला. वर मुलाने ही मागणी धुडकावून लावली. लग्न मोडले. त्यानंतर जात पंचायत बसविण्यात आली. जात पंचायतीने मुलासह संपूर्ण कुटूंबियांवर बहिष्कार टाकला. फेब्रुवारी २०२१ ते आजपर्यंत या बहिष्काराचा मन:स्ताप कुटूंबियास सोसावा लागत असल्याचा आरोप करीत उमरेड पोलीस ठाण्यात गुरुवारी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय तेजराम राठोड (३२, रा.मांडवा, ता. भिवापूर) असे तक्रारकर्त्या वर मुलाचे नाव आहे. याप्रकरणामुळे ‘जात पंचायती’च्या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे. दावला दलसिंग जाधव या प्रमुख नायकासह झुमा कुंवरसिंग मेघावत, ताराचंद कुंवरसिंग मेघावत, सदाराम दादु चव्हाण, किसन गुलाब पवार, बाबासाहेब सेवु राठोड, देवाराम घोलवा राठोड, बहादुर वसराम राठोड, नेलसिंग लालसिंग पवार आणि चेलसिंग लालसिंग पवार सर्व रा.मांडवा, ता. भिवापूर अशी आरोपींची नावे आहेत.

आर्वी, जि. वर्धा येथील एका मुलीशी मांडवा येथील निवासी विजय राठोड या तरुणाचे लग्न जुळले. ५ मे २०२० ला विवाह सोहळा ठरला. वर-वधुकडील कुटूंबियांनी लग्नसमारंभाची तयारी केली होती. अशातच लॉकडाऊनमुळे तारीख पुढे ढकलल्या गेली. डिसेंबर २०२० च्या अखेरीस मुलीकडील कुटूंबियांनी लग्नापूर्वीच्या खर्चापोटी वर मुलगा विजय राठोड यास ७० हजार रुपयांची मागणी केली. विजय राठोड याने रक्कम देण्यास नकार दर्शविला. वाद वाढला. अशातच मुलीकडील मंडळींनी वर मुलाच्या मांडवा गावातच ३ फेब्रुवारी २०२१ ला जात पंचायत बसविली.

जात पंचायतीमध्ये सुद्धा मी लग्नास तयार आहे परंतु रक्कम देवू शकत नाही, अशी भुमिका विजय राठोड याने स्पष्ट केली. आरोप-प्रत्यारोप झाले. लग्न मोडले. विजय राठोड याच्यामुळे लग्न मोडल्या गेले, असा ठपका जात पंचायतीने ठेवत विजय राठोड आणि कुटूंबियांवर बहिष्कार टाकत असल्याचा निर्णय दिला. असे तक्रारीत नमूद आहे.

अशी टाकली बंदी 

३ फेब्रुवारी २०२१ ला दावला जाधव या प्रमुख नायकाच्या नेतृत्त्वात जात पंचायतीने विजय राठोड व कुटूंबियास जाती बाहेर करीत गावातील सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहण्याची बंदीचा निर्णय जाहीर केला. कुटूंबियांना मंदिरामध्ये जाण्यास बंदी टाकल्या गेली. तक्रारकर्त्याच्या शेतात शेतमजुरांना सुद्धा जाण्यास बंदीचा निर्णय जात पंचायतीने घेतला. गावातील लोकांना विजयच्या घरी जाण्याची बंदी टाकण्यात आली, अशी बाब तक्रारीत नमूद आहे.

कुटूंब दहशतीत 

उमरेडपासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडवा या गावाला लागून लभान (मांडवा) हे दुसरे गाव आहे. या परिसरात फेब्रुवारी महिन्यात मोठी यात्रा भरते. या यात्रेदरम्यान मंदिरात विजय राठोड याच्या आईला प्रवेश नाकारला गेला. काकाच्या मुलाच्या लग्नालाही थांबविण्यात आले, असा आरोप विजय राठोड याने केला आहे. जात पंचायतीच्या बहिष्काराच्या निर्णयानंतर आई-वडिल, भाऊ आणि मी असे संपूर्ण कुटूंब दहशतीत असल्याची कैफीयत विजय राठोड याने लोकमतजवळ मांडली.

गुन्हा दाखल, तपास सुरु 

मांडवा येथील बंजारा समाजाच्या जात पंचायतीने विजय व त्याच्या कुंटूबियांस समाजातून बहिष्कृत केल्याने विजयच्या तक्रारीवरून उमरेड पोलीस ठाण्यात १५३ ब, ३४ भादवि सहकलम ३,५ महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक राजीव लोले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्नnagpurनागपूरPoliceपोलिस