शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लग्नास नकार दिला म्हणून तरूणीने केलं तरूणाचं अपहरण, मंदिरात जबरदस्ती करणार होती लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:05 IST

UP Crime News : पोलिसांनुसार, तरूणाने लग्नास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरूणीने आपला भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून तरूणाचं अपहरण केलं. तरूणाला जबरदस्ती आर्य समाज मंदिरात नेण्यात आलं.

UP Crime News : उत्तर प्रदेशच्या बिजनौरच्या चांगपूरमध्ये ज्यूडिशिअल मॅजिस्ट्रेटच्या स्टेनोचं सिनेमा स्टाइलने ऑफिसला जाताना अपहरण करण्यात आलं. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली. त्यानंतर चार तासातच पोलिसांनी अपहरण झालेल्या तरूणाचा शोध लावला.  तर तसेच पोलिसांनी अपहरण करणाऱ्या तरूणीला आणि तिच्या भावाच्या साथीदारांना अटक केली.

पोलिसांनुसार, तरूणाने लग्नास नकार दिल्याने नाराज झालेल्या तरूणीने आपला भाऊ आणि त्याच्या मित्रांसोबत मिळून तरूणाचं अपहरण केलं. तरूणाला जबरदस्ती आर्य समाज मंदिरात नेण्यात आलं. यादरम्यान तरूणाच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे पोलीस मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तिन्ही आरोपींना अटक केली. तेच तरूणाला सुखरूप परत आणलं.

पोलीस अधिक्षक दिनेश सिंह यांनी सांगितलं की, चांदपूर ज्युडिशल मॅजिस्ट्रेटचे स्टेनो अंकुरचं ऑफिसला जाताना काही लोकांना अपहरण केलं होतं. त्याला कारमधून उचलून नेण्यात आलं होतं. अंकुर यावेळी त्याच्या साथीदारासोबत ऑफिसला जात होता.

या घटनेची सूचना मिळताच पोलीस सतर्क झाले आणि त्यांनी अंकुरचा मोबाइल ट्रेस केला. त्यानंतर त्याचा पाठलाग केला. त्याद्वारे पोलीस आर्य समाज मंदिरात पोहोचले. अपहरण करणारी तरूणी आणि तिच्या भावाच्या मित्रांना पकडण्यात आलं आहे. इतर चार फरार झाले.  चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितलं की, स्टेनो अंकुरचं लग्न 14 मे 2021 ला तरूणीसोबत होणार होतं. त्यावेळीच हुंडा, गाडी, भेटवस्तू देण्यात आल्या होत्या. पण नंतर अंकुरने तरूणीसोबत लग्न करण्यास नकार दिला.  

आरोपींनी सांगितलं की, तरूणाला लग्नासाठी अनेकदा समजावण्यात आलं. पण तो तयार नव्हता. त्यामुळे त्याचं तरूणीसोबत लग्न लावून देण्याच्या उद्देशाने त्याचं अपहरण करण्यात आलं. लग्न लावण्यासाठी त्यांना आर्य समाज मंदिरात नेलं होतं. मंदिरात आरोपी तरूणीचं आणि अंकुरचं लग्न लावून देण्यात येणार होतं. जर तो लग्नासाठी तयार झाला नसता तर त्याची हत्या करण्यात येणार होती.

अंकुरने सांगितलं की, त्याचं लग्न या तरूणीसोबत ठरलं होतं. पण फोनवर बोलल्यावर त्यांच्यात काहीतरी वाद झाला. यानंतर त्याने लग्नास नकार दिला. यादरम्यान दोन्हीकडील लोकांमध्ये अनेक बैठकी झाल्या. हुंड्यातील सगळं काही करण्याचं ठरलं होतं. मुलीकडील लोकांनीही हे मान्य केलं. पण घरी जाऊन नकार देत होते आणि आरोपी जबरदस्ती लग्न करण्यास दबाव टाकत होते.

लग्न न केल्यास जीवे मारण्याची आणि अपहरण करण्याची धमकी दिली जात होती. अशातच गुरूवारी ऑफिसला जात असताना अंकुरची बाइक अडवली गेली आणि त्याला एका कारमध्ये टाकून नेण्यात आलं. आर्य समाज मंदिरात त्याचं जबरदस्ती लग्न लावून देण्यात येणार होतं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी