शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

हरवलेल्या १२ वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 16:18 IST

तो मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता.

ठळक मुद्देआर्यन गुप्ता असे मुलाचे नाव असून तो सहावीचा विद्यार्थी आहे. जोगेश्वरीच्या मिल्लतनगर परिसरात आर्यन कुटुंबीयांसोबत राहायचा.

मुंबई - जोगेश्वरीतून बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलाचा वर्सोवाच्या समुद्रकिनारी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आर्यन गुप्ता असे मुलाचे नाव असून तो सहावीचा विद्यार्थी आहे. तो मंगळवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता.

जोगेश्वरीच्या मिल्लतनगर परिसरात आर्यन कुटुंबीयांसोबत राहायचा. मंगळवारी सायंकाळपासून तो बेपत्ता झाला. रात्री उशिरापर्यंत त्याचा काहीच थांगपत्ता न लागल्याने गुप्ता कुटुंबीयांनी ओशिवरा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. हा शोध सुरू असतानाच बुधवारी वर्सोवाच्या समुद्रकिनारी त्याचा मृतदेह सापडला.

प्राथमिक तपासात तो बुडाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याची हत्या केल्याचा संशय कुटुंबीयांना आहे.त्याच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका मुलीचे अपहरण झाले व त्यानंतर तिचा मृतदेह सापडला होता़ त्यामुळे संतप्त जमावाने रास्ता रोको केला व पोलिसांनाही धक्काबुकी झालीहोती़

टॅग्स :Deathमृत्यूMissingबेपत्ता होणंMumbaiमुंबईPoliceपोलिसStudentविद्यार्थीKidnappingअपहरण