शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

बिहारी चोरटे, तामिळनाडूत चोरी, राजधानी एक्सप्रेस अन् ... चार ट्रॉली बॅग भरून आढळले मोबाईल!  

By नरेश डोंगरे | Updated: December 9, 2023 16:20 IST

नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली.

नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत राजधानी एक्सप्रेस तामिळनाडूतून दिल्लीकडे निघाली. नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली. 'हे, तेच' असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या स्थानकावर त्या दोघांना घेऊन पोलीस उतरले. डब्यातील इतर प्रवाशांना काय प्रकार आहे, ते कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे ते आपसात कुजबूज करू लागले. नंतर मात्र हळूच एकाने त्यांना प्रकार काय आहे ते सांगितले अन् अतिशय साळसुदपणे आपल्यासोबत बसून असलेले ते दोन मुले अट्टल चोरटे असल्याचे प्रवाशांना कळाल्यानंतर अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला.

रावल कुमार आणि कृष्णकुमार (दोघांचीही नावे बदललेली) हे अनुक्रमे १७ आणि १६ वर्षांची दोन मुले. जेमतेम मिसुरडं फुटलेले हे दोघे बिहारमधील सराय साहो येथील रहिवासी. काही दिवसांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. कांचीपूरम जिल्ह्यातील ओरागडम पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे एक मोबाईलचे शोरूम त्यांनी शुक्रवारी पहाटे फोडले आणि तेथून ८ लाख रुपये किंमतीचे ८२ मोबाईल चोरून ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसले. तिकडे कांचीपूरम पोलिसांनी चोरीची तक्रार मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढणे सुरू केले. ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे निघाल्याचे कळताच कांचीपूरम पोलिसांनी नागपूर आरपीएफला माहिती दिली. 

त्यानुसार, राजधानी एक्सप्रेस नागपूरात येताच आरपीएफच्या पथकाने गाडीची चौकशी सुरू केली. मात्र, वेळेअभावी गाडीची तपासणी अर्धवट राहिल्याने आणि राजधानी एक्सप्रेस मार्गस्थ झाल्याने आरपीएफच्या पथकाने धावत्या ट्रेनमध्ये तपासणी सुरू ठेवली आणि अखेर बी-९ कोचमध्ये काटोल स्थानकाजवळ आरोपी आरपीएफच्या हाती लागले. त्यांच्या जवळ असलेल्या चार मोठ्या सुटकेस (ट्रॉली बॅग)मध्ये मोबाईल भरून होते. ते ताब्यात घेऊन आरोपींना आमला स्थानकावर उतरवण्यात आले. 

त्यांचे मनसुबे उधळलेदिल्ली मार्गे आपल्या प्रांतात जाऊन मोबाईल विकण्याचे आणि त्यातून आलेल्या पैशातून मजा मारण्याचे या भामट्यांचे मनसुबे होते. कांचीपूरम पासून नागपूरपयर्यंत अर्थात सुमारे १२०० किलोमिटर दूर आल्यानंतर ते फारच आश्वस्त होते. मात्र, नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना जेरबंद केल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले. 

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी