शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

बिहारी चोरटे, तामिळनाडूत चोरी, राजधानी एक्सप्रेस अन् ... चार ट्रॉली बॅग भरून आढळले मोबाईल!  

By नरेश डोंगरे | Updated: December 9, 2023 16:20 IST

नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली.

नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत राजधानी एक्सप्रेस तामिळनाडूतून दिल्लीकडे निघाली. नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली. 'हे, तेच' असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या स्थानकावर त्या दोघांना घेऊन पोलीस उतरले. डब्यातील इतर प्रवाशांना काय प्रकार आहे, ते कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे ते आपसात कुजबूज करू लागले. नंतर मात्र हळूच एकाने त्यांना प्रकार काय आहे ते सांगितले अन् अतिशय साळसुदपणे आपल्यासोबत बसून असलेले ते दोन मुले अट्टल चोरटे असल्याचे प्रवाशांना कळाल्यानंतर अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला.

रावल कुमार आणि कृष्णकुमार (दोघांचीही नावे बदललेली) हे अनुक्रमे १७ आणि १६ वर्षांची दोन मुले. जेमतेम मिसुरडं फुटलेले हे दोघे बिहारमधील सराय साहो येथील रहिवासी. काही दिवसांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. कांचीपूरम जिल्ह्यातील ओरागडम पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे एक मोबाईलचे शोरूम त्यांनी शुक्रवारी पहाटे फोडले आणि तेथून ८ लाख रुपये किंमतीचे ८२ मोबाईल चोरून ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसले. तिकडे कांचीपूरम पोलिसांनी चोरीची तक्रार मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढणे सुरू केले. ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे निघाल्याचे कळताच कांचीपूरम पोलिसांनी नागपूर आरपीएफला माहिती दिली. 

त्यानुसार, राजधानी एक्सप्रेस नागपूरात येताच आरपीएफच्या पथकाने गाडीची चौकशी सुरू केली. मात्र, वेळेअभावी गाडीची तपासणी अर्धवट राहिल्याने आणि राजधानी एक्सप्रेस मार्गस्थ झाल्याने आरपीएफच्या पथकाने धावत्या ट्रेनमध्ये तपासणी सुरू ठेवली आणि अखेर बी-९ कोचमध्ये काटोल स्थानकाजवळ आरोपी आरपीएफच्या हाती लागले. त्यांच्या जवळ असलेल्या चार मोठ्या सुटकेस (ट्रॉली बॅग)मध्ये मोबाईल भरून होते. ते ताब्यात घेऊन आरोपींना आमला स्थानकावर उतरवण्यात आले. 

त्यांचे मनसुबे उधळलेदिल्ली मार्गे आपल्या प्रांतात जाऊन मोबाईल विकण्याचे आणि त्यातून आलेल्या पैशातून मजा मारण्याचे या भामट्यांचे मनसुबे होते. कांचीपूरम पासून नागपूरपयर्यंत अर्थात सुमारे १२०० किलोमिटर दूर आल्यानंतर ते फारच आश्वस्त होते. मात्र, नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना जेरबंद केल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले. 

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी