शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

बिहारी चोरटे, तामिळनाडूत चोरी, राजधानी एक्सप्रेस अन् ... चार ट्रॉली बॅग भरून आढळले मोबाईल!  

By नरेश डोंगरे | Updated: December 9, 2023 16:20 IST

नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली.

नागपूर : वेगाशी स्पर्धा करीत राजधानी एक्सप्रेस तामिळनाडूतून दिल्लीकडे निघाली. नागपूरहून पुढे निघाल्यानंतर अचानक कोच नंबर बी-९ मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) एक पथक शिरले. त्या डब्यात बसलेल्यांपैकी दोन संशयीतांची त्यांनी चाैकशी सुरू केली. 'हे, तेच' असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढच्या स्थानकावर त्या दोघांना घेऊन पोलीस उतरले. डब्यातील इतर प्रवाशांना काय प्रकार आहे, ते कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे ते आपसात कुजबूज करू लागले. नंतर मात्र हळूच एकाने त्यांना प्रकार काय आहे ते सांगितले अन् अतिशय साळसुदपणे आपल्यासोबत बसून असलेले ते दोन मुले अट्टल चोरटे असल्याचे प्रवाशांना कळाल्यानंतर अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला.

रावल कुमार आणि कृष्णकुमार (दोघांचीही नावे बदललेली) हे अनुक्रमे १७ आणि १६ वर्षांची दोन मुले. जेमतेम मिसुरडं फुटलेले हे दोघे बिहारमधील सराय साहो येथील रहिवासी. काही दिवसांपूर्वी ते तामिळनाडूत गेले होते. कांचीपूरम जिल्ह्यातील ओरागडम पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे एक मोबाईलचे शोरूम त्यांनी शुक्रवारी पहाटे फोडले आणि तेथून ८ लाख रुपये किंमतीचे ८२ मोबाईल चोरून ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसले. तिकडे कांचीपूरम पोलिसांनी चोरीची तक्रार मिळताच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढणे सुरू केले. ते राजधानी एक्सप्रेसमध्ये बसून नागपूरकडे निघाल्याचे कळताच कांचीपूरम पोलिसांनी नागपूर आरपीएफला माहिती दिली. 

त्यानुसार, राजधानी एक्सप्रेस नागपूरात येताच आरपीएफच्या पथकाने गाडीची चौकशी सुरू केली. मात्र, वेळेअभावी गाडीची तपासणी अर्धवट राहिल्याने आणि राजधानी एक्सप्रेस मार्गस्थ झाल्याने आरपीएफच्या पथकाने धावत्या ट्रेनमध्ये तपासणी सुरू ठेवली आणि अखेर बी-९ कोचमध्ये काटोल स्थानकाजवळ आरोपी आरपीएफच्या हाती लागले. त्यांच्या जवळ असलेल्या चार मोठ्या सुटकेस (ट्रॉली बॅग)मध्ये मोबाईल भरून होते. ते ताब्यात घेऊन आरोपींना आमला स्थानकावर उतरवण्यात आले. 

त्यांचे मनसुबे उधळलेदिल्ली मार्गे आपल्या प्रांतात जाऊन मोबाईल विकण्याचे आणि त्यातून आलेल्या पैशातून मजा मारण्याचे या भामट्यांचे मनसुबे होते. कांचीपूरम पासून नागपूरपयर्यंत अर्थात सुमारे १२०० किलोमिटर दूर आल्यानंतर ते फारच आश्वस्त होते. मात्र, नागपूर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना जेरबंद केल्याने त्यांचे मनसुबे उधळले गेले. 

टॅग्स :railwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी